शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

उद्धव ठाकरेंना Action Mode वर येण्यास उशीर..; मालेगावच्या सभेवरून शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 12:20 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वारंवार काँग्रेस अपमान करतेय. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गप्प आहेत असंही मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

मुंबई - उद्धव ठाकरे यांना Action Mode वर यायला उशीर झाला. २०१९ ला मविआच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले, पक्षाचे पक्षप्रमुख होते. सत्तेत असताना, मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना वारंवार सांगायचो. आपल्यासोबत सत्तेत असणारे सत्तेचा फायदा घेत लोकांमध्ये फिरतायेत, राज्यभर जातायेत. तुम्हीही फिरायला हवं. लोकांमध्ये जायला हवं असं त्यांना सांगितले. परंतु अडीच वर्षाच्या काळात ते लोकांमध्ये आले नाहीत. पण आता ते जातायेत. त्यांना उशीर झाला अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी मालेगावच्या सभेवरून ठाकरेंना टोला लगावला आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, सभा घेतल्या तर राज्याच्या हिताचं बोलायला हवं. पण सभा पाहिल्या, पत्रकार परिषदा पाहिल्या तर केवळ आमच्या ५० लोकांवर टीका करायची. घालूनपाडून बोलायचे. बाळासाहेब ठाकरे ज्वलंत हिंदुत्वाचा विचार द्यायचे त्यावर उद्धव ठाकरे बोलत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वारंवार काँग्रेस अपमान करतेय. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गप्प आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीच हे सहन केले नसते. केवळ ४०-५० आमदारांच्या मतदारसंघात जायचं आणि टीका करायची हेच करतायेत. १८ तास आत्ताचे मुख्यमंत्री काम करतायेत. ज्यांना आमच्यावर टीका करायची करू द्या, आम्ही आमचे काम करतोय असंही त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेब ठाकरे असते तर उर्दूतील पोस्टर्स लागले असते तर ते चालले असते का? सत्तेसाठी आणि मविआसाठी काय काय सहन करावे लागतेय हे लोकांनी विचार करायला हवा. संजय राऊतांना काय बोलायचे ते बोलू द्या. त्यांच्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेची अशी अवस्था झालीय, ४० आमदार, १३ खासदार बहुतांश जिल्हाप्रमुख हे वेगळे झाले. हिंदुत्वापासून शिवसेनेला बाजूला नेण्याचं काम संजय राऊतांनी केले. उद्धव ठाकरे कधी टोमणे देत नव्हते पण राऊतांची संगत जास्त वाढली तेव्हापासून हे असे बोलायला लागले. तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार, ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा तुमच्याकडे आहे परंतु तुम्ही त्यापासून दूर जात आहात असं मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. संजय राऊत कुणासाठी काम करतात हा खरा तर संशोधनाचा विषय आहे अशी टीकाही शंभुराज देसाईंनी ठाकरेंसह संजय राऊतांवर केली आहे. 

CAG रिपोर्टमध्ये गंभीर ताशेरे  मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कॅगचा अहवाल सभागृहात मांडला. हा रिपोर्ट सर्वांसाठी खुला झाला आहे. त्याचा अवलोकन आदित्य ठाकरेंनी करावे. १२ हजार कोटींच्या कामात गंभीर अनियमितता झालीय त्याचे ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडले. कॅगच्या रिपोर्टमध्ये जे काही आले ते मांडले आहे. जनतेच्या पैशांची अशी अफरातफर झालीय त्याची चौकशी व्हायला हवी. या रिपोर्टवरून SIT नेमा अशी आमची मागणी होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे भूमिका मांडतील असं शंभुराज देसाई यांनी सांगितले. 

त्याचसोबत कॅगचा अहवाल वाचा आणि त्यात जे आक्षेप असतील त्यावर सभागृहात बोला. आदित्य ठाकरे सभागृहात बोलत नाही. विधेयके मंजूर झाले, अर्थसंकल्प मांडले कशावरही ते बोलले नाहीत. आता कॅगचा अहवाल आहे. त्यावर एक दीड महिना अभ्यास करा आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी बोला. माध्यमांपुढे जायचे, चौकशीला सामोरे जायची तयारी त्यांनी करायली हवी असा चिमटाही शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना काढला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाई