शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिवसेनेने गृहखाते राष्ट्रवादीसाठी सोडले, अनिल देशमुख गृहमंत्री; आदित्य ठाकरेंकडे पर्यटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 06:14 IST

आठवडाभरापासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आले.

मुंबई : आठवडाभरापासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले गृहखाते राष्टÑवादी काँग्रेसकडे गेले असून, आता विदर्भातील राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे नवे गृहमंत्री असतील. गृहखाते राष्टÑवादीकडेच जाणार हे ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर खातेवाटपाची अधिकृत घोषणा झाली.खातेवाटपात राष्ट्रवादीकडे गृह, वित्त व नियोजन, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन यांसारखी महत्त्वाची खाती आली आहेत. तर, काँग्रेसकडे महसूल व ऊर्जा या खात्यांह सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मदत पुनर्वसन, ओबीसी, क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धविकास, वस्रोद्योग आदी खाती आली. ग्रामविकास अथवा कृषिखात्यासाठी काँग्रेसने जोर लावला होता. मात्र, ही दोन्ही खाती काँग्रेसला मिंळाली नाहीत. ग्रामविकास खाते राष्ट्रवादीकडे तर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय ही खाते स्वत:कडे ठेवली आहेत. विशेष म्हणजे, नगरविकास खाते स्वत:कडेच ठेवण्याचा आजवरच्या मुख्यमंत्र्यांचा पायंडाही या निमित्ताने ठाकरे यांनी मोडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याचा भार असणार आहे. यापूर्वीदेखील अजित पवार यांनी ही खाती सांभाळली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खाते देण्यात आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती आली आहेत.>‘सीएमओ’ बनलेच नाहीपंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री कार्यालय’ असे खाते तयार करून त्याची जबाबदारी शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा होती. मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांना साहाय्य व्हावे, यासाठी ही व्यवस्था केली जाईल, असा दावा करण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र असा कोणताच विभाग बनविण्यात आला नाही, तसेच खाते वाटपातील नाराजी टाळण्यासाठी मेट्रो, वाणिज्य आणि तीर्थक्षेत्र विकास ही नवीन खाती तयार केली जातील, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र, अशा प्रकारे कोणतेच खाते तयार करण्यात आले नाही.>असाही योगायोग!मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील ४३ पैकी ३९ मंत्री विधानसभेचे सदस्य आहेत. ३९ पैकी २१ मंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांचाच पराभव केला आहे. काँग्रेसच्या १४ मंत्र्यांनी शिवसेनेचा, शिवसेनेच्या ४ मंत्र्यांनी राष्ट्रवादीचा, तर३ मंत्र्यांनी काँग्रेसचा पराभव केला आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार