शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बमुळे शिवसेनेत नाराजी; बालेकिल्ल्याला लवकरच मोठी गळती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:04 IST

मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी संदर्भात लिहिलेल्या पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणार रिफायनरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पक्षात नाराजी आहे. शिवसेनेची भूमिका का बदलली, अशी विचारणा राजापुरातील पदाधिकाऱ्यांकडे स्थानिक करत आहेत. त्यांना उत्तर देणं पदाधिकाऱ्यांना अवघड जात आहे. राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षप्रमुखांनी आपल्याला विचारात न घेतल्यानं ही नाराजी आहे. त्यामुळे लवकरच या भागात शिवसेनेला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. 

सध्या शिवसेना राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवत आहे. पण रिफायनरीबद्दल शिवसेनेचा सूर बदलल्यानं राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे, गोवळ आणि शिवणे खुर्द या गावांमध्ये पक्षाबद्दल मोठी नाराजी आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार नाही.

राजापुरात सोमवारी दुपारी शिवसंपर्क अभियानच्या नियोजनाबद्दल बैठक झाली. यावेळी रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या गावांबाबत चर्चा झाली. सध्या या ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्यास एखादा गंभीर प्रकार घडण्याची भीती काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर वस्तुस्थिती समजून घेत या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान न राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

आगामी काळात जिल्हा आणि तालुका स्तरावरील काही कार्यकर्ते आणि नेते आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राजापूर पश्चिम भागात शिवसेनेत मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. काही स्थानिक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या या पत्रामुळे आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे प्रचंड नाराज आहेत. पक्षप्रमुखांनी भूमिका बदलल्यामुळे स्थानिकांना काय उत्तर द्यायची असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnanar refinery projectनाणार प्रकल्पNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना