शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बमुळे शिवसेनेत नाराजी; बालेकिल्ल्याला लवकरच मोठी गळती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:04 IST

मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी संदर्भात लिहिलेल्या पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणार रिफायनरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पक्षात नाराजी आहे. शिवसेनेची भूमिका का बदलली, अशी विचारणा राजापुरातील पदाधिकाऱ्यांकडे स्थानिक करत आहेत. त्यांना उत्तर देणं पदाधिकाऱ्यांना अवघड जात आहे. राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षप्रमुखांनी आपल्याला विचारात न घेतल्यानं ही नाराजी आहे. त्यामुळे लवकरच या भागात शिवसेनेला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. 

सध्या शिवसेना राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवत आहे. पण रिफायनरीबद्दल शिवसेनेचा सूर बदलल्यानं राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे, गोवळ आणि शिवणे खुर्द या गावांमध्ये पक्षाबद्दल मोठी नाराजी आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार नाही.

राजापुरात सोमवारी दुपारी शिवसंपर्क अभियानच्या नियोजनाबद्दल बैठक झाली. यावेळी रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या गावांबाबत चर्चा झाली. सध्या या ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्यास एखादा गंभीर प्रकार घडण्याची भीती काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर वस्तुस्थिती समजून घेत या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान न राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

आगामी काळात जिल्हा आणि तालुका स्तरावरील काही कार्यकर्ते आणि नेते आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राजापूर पश्चिम भागात शिवसेनेत मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. काही स्थानिक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या या पत्रामुळे आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे प्रचंड नाराज आहेत. पक्षप्रमुखांनी भूमिका बदलल्यामुळे स्थानिकांना काय उत्तर द्यायची असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnanar refinery projectनाणार प्रकल्पNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना