शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

"देशात आणीबाणी लावण्यात आली कारण...", संविधान हत्या दिनाच्या मुद्द्यावरून अटलजींचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:57 IST

राऊत म्हणाले, "आणीबाणीला 50 वर्षं झाली आहेत. लोक विसरले आहे. देशात आणीबाणी का लावली गेली, कारण या देशात...

आणीबाणीच्या काळात ज्यांनी अमानुष यातना सोसल्या त्यांचे योगदान स्मरणात रहावे, यासाठी मोदी सरकारने 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले राऊत? -राऊत म्हणाले, "आणीबाणीला 50 वर्षं झाली आहेत. लोक विसरले आहे. देशात आणीबाणी का लावली गेली, कारण या देशात काही लोकांना अराजक निर्माण करायचे होते. रामलिला मैदानावरून आपल्या जवानांना आणि पोलिसांना, सरकारच्या आदेशाचे पान करूना म्हणून भडकावले जात होते. अशा परिस्थितीत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असते, तर त्यांनीही आणीबाणी लावली असती. हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता." एवढेच नाही, तर नरेद्र मोदी आणि त्यांच्या सरकार यामुळे बहुमत मिळाले नाही. कारण त्यांना संविधान बदलायचे होते," असेही राऊत यावेळी म्हणाले.

काँग्रेसचाही मोदी सरकारवर पलटवार -"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये गेल्या दहा वर्षांपासून अघोषित आणीबाणी लादली होती. गेल्या ४ जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निवडणुकांत भारतीय जनतेने पंतप्रधान मोदी यांचा राजकीय व नैतिक स्तरावर पराभव केला. हा दिवस इतिहासात ‘मोदीमुक्ती दिन’ म्हणून नोंदवला जाईल," असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, "आणीबाणीत संविधान पायदळी तुडवल्याने काय काय घडले, याची आठवण २५ जून रोजी पाळण्यात येणारा ‘संविधान हत्या दिन’ नेहमीच जागती ठेवणार आहे," असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी