शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“पक्षप्रमुख आदेश देतील, पण ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा”; सेना नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 22:57 IST

कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे.

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटमही दिले आहे. यावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना नेत्याने यावर भाष्य करत, पक्षप्रमुख जे आदेश देतील त्यानुसार जे काही उत्तर द्यायचे असेल, ते उत्तर देण्यात येईल. तसेच 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असे म्हटले आहे. 

राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजीनगर येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असून, ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. मात्र, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात येत आहे. राज ठाकरेंची मशिदींवरील भोंग्यांची भूमिका, अयोध्या दौरा, तिसरी जाहीर सभा आणि सुरक्षा यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावर आपले मत मांडले आहे. औरंगाबाद येथील सिंचन भवनाच्या बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्यानुसार पक्षप्रमुख आदेश देतील

राज ठाकरे स्थिर नाहीत. त्यांच्यात जी राजकीय अस्थिरता आली आहे, त्याला नवसंजीवनी देण्याचा ते प्रयत्न करत असून, आधी शरद पवारांसोबत गेले, त्यानंतर भाजपवर हल्ला केला, आता मशीद आणि मंदिराचा विषय काढून राजकीय स्पीकर वाजवून मशीदवरील भोंगे बंद करा, असा नवीन पॅटर्न आणून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि पक्षप्रमुख जे काही आदेश देतील, त्याप्रमाणे 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असा अप्रत्यक्ष इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंनी ३ मेचे अल्टिमेटम दिले आहे, यावर बोलताना, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सर्व मिळून निर्णय घेतील. त्यानुसार नियमावली तयार करण्यात येईल आणि त्या नियमांप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असा विश्वास असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद