शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

“पक्षप्रमुख आदेश देतील, पण ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा”; सेना नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 22:57 IST

कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे.

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटमही दिले आहे. यावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना नेत्याने यावर भाष्य करत, पक्षप्रमुख जे आदेश देतील त्यानुसार जे काही उत्तर द्यायचे असेल, ते उत्तर देण्यात येईल. तसेच 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असे म्हटले आहे. 

राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजीनगर येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असून, ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. मात्र, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात येत आहे. राज ठाकरेंची मशिदींवरील भोंग्यांची भूमिका, अयोध्या दौरा, तिसरी जाहीर सभा आणि सुरक्षा यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावर आपले मत मांडले आहे. औरंगाबाद येथील सिंचन भवनाच्या बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्यानुसार पक्षप्रमुख आदेश देतील

राज ठाकरे स्थिर नाहीत. त्यांच्यात जी राजकीय अस्थिरता आली आहे, त्याला नवसंजीवनी देण्याचा ते प्रयत्न करत असून, आधी शरद पवारांसोबत गेले, त्यानंतर भाजपवर हल्ला केला, आता मशीद आणि मंदिराचा विषय काढून राजकीय स्पीकर वाजवून मशीदवरील भोंगे बंद करा, असा नवीन पॅटर्न आणून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि पक्षप्रमुख जे काही आदेश देतील, त्याप्रमाणे 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असा अप्रत्यक्ष इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंनी ३ मेचे अल्टिमेटम दिले आहे, यावर बोलताना, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सर्व मिळून निर्णय घेतील. त्यानुसार नियमावली तयार करण्यात येईल आणि त्या नियमांप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असा विश्वास असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद