शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

“पक्षप्रमुख आदेश देतील, पण ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा”; सेना नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 22:57 IST

कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे.

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटमही दिले आहे. यावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना नेत्याने यावर भाष्य करत, पक्षप्रमुख जे आदेश देतील त्यानुसार जे काही उत्तर द्यायचे असेल, ते उत्तर देण्यात येईल. तसेच 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असे म्हटले आहे. 

राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजीनगर येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असून, ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. मात्र, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात येत आहे. राज ठाकरेंची मशिदींवरील भोंग्यांची भूमिका, अयोध्या दौरा, तिसरी जाहीर सभा आणि सुरक्षा यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावर आपले मत मांडले आहे. औरंगाबाद येथील सिंचन भवनाच्या बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्यानुसार पक्षप्रमुख आदेश देतील

राज ठाकरे स्थिर नाहीत. त्यांच्यात जी राजकीय अस्थिरता आली आहे, त्याला नवसंजीवनी देण्याचा ते प्रयत्न करत असून, आधी शरद पवारांसोबत गेले, त्यानंतर भाजपवर हल्ला केला, आता मशीद आणि मंदिराचा विषय काढून राजकीय स्पीकर वाजवून मशीदवरील भोंगे बंद करा, असा नवीन पॅटर्न आणून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि पक्षप्रमुख जे काही आदेश देतील, त्याप्रमाणे 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असा अप्रत्यक्ष इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंनी ३ मेचे अल्टिमेटम दिले आहे, यावर बोलताना, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सर्व मिळून निर्णय घेतील. त्यानुसार नियमावली तयार करण्यात येईल आणि त्या नियमांप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असा विश्वास असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद