शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:38 IST

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.

मुंबई - निष्ठावंत आणि आयारामांचा संघर्ष भाजपमध्ये वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याची पूर्वकल्पना असल्यामुळेच शिवसेनेने युती करताना सौम्य भूमिका घेतली आहे. किंबहुना भाजपमध्ये आलेल्या आयारामांच्या पाहुणचाराचा भारच शिवसेनेने उचलला आहे. खुद्द सामनातून शिवसेनेने याची कबुली दिली आहे.

शिवसेनेने युतीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सामनामधून स्पष्टीकरण दिले. युतीत शिवसेनेला 124 आणि भाजपला 164 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. आग्रलेखात म्हटलं की, युती म्हटलं की देवाण-घेवाण आली. परंतु, यावेळी शिवसेनेला देवाण अधिक करावी लागली. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये आले आहेत. या नेत्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर भाजपला मोठा घास देणे आवश्यक असून तो आम्ही मान्य केल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे भाजपने शिवसेनेच्या जीवावर आयारामांचा पाहुणचार करण्याचा बेत आखला होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्या सर्वांना सामावून घेताना भाजपच्या नाकी नऊ येत आहेत. अशा स्थितीत शिवसेनेकडून वाढवून घेतलेल्या जागांवर आयारामांना संधी मिळत आहे.

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.