शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:38 IST

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.

मुंबई - निष्ठावंत आणि आयारामांचा संघर्ष भाजपमध्ये वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याची पूर्वकल्पना असल्यामुळेच शिवसेनेने युती करताना सौम्य भूमिका घेतली आहे. किंबहुना भाजपमध्ये आलेल्या आयारामांच्या पाहुणचाराचा भारच शिवसेनेने उचलला आहे. खुद्द सामनातून शिवसेनेने याची कबुली दिली आहे.

शिवसेनेने युतीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सामनामधून स्पष्टीकरण दिले. युतीत शिवसेनेला 124 आणि भाजपला 164 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. आग्रलेखात म्हटलं की, युती म्हटलं की देवाण-घेवाण आली. परंतु, यावेळी शिवसेनेला देवाण अधिक करावी लागली. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये आले आहेत. या नेत्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर भाजपला मोठा घास देणे आवश्यक असून तो आम्ही मान्य केल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे भाजपने शिवसेनेच्या जीवावर आयारामांचा पाहुणचार करण्याचा बेत आखला होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्या सर्वांना सामावून घेताना भाजपच्या नाकी नऊ येत आहेत. अशा स्थितीत शिवसेनेकडून वाढवून घेतलेल्या जागांवर आयारामांना संधी मिळत आहे.

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.