शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 14:22 IST

नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

ठळक मुद्देअहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला धोबीपछाड शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

मुंबई - अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला धोबीपछाड शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाला डावलून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत अहमदनगरची सत्ता मिळवण्याचा डाव शिवसेनेवरच उलटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.   त्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र निकालांमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भाजपाने  कुरघोडीच्या राजकारणात आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपले महापौर आणि उपमहापौर नगरच्या महानगरपालिकेत बसवले होते. दरम्यान, अहमदनगरमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले की, ''अहमदनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.''  दरम्यान, दरम्यान, नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर सांगितली होती. नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंब्यापाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती.  मीसुद्धा सेनेकडूना ची मागणी झाल्यास पाठिंबा द्या, असे सुचवले.  मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते. मात्र पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घालण्यात आली. मात्र पाठिंब्यासाठी शिवसेनेने  प्रस्ताव दिला पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले. अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होतो. अखेरीस शेवटच्या दिवशी महापौर निवडीसंदर्भातील सर्वाधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले, असे फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमBJPभाजपा