शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं; भाजपमध्ये कुजबूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 10:50 IST

मागील 25-30 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना पक्षांची मैत्री होती. मात्र मुख्यमंत्रीपदामुळे ही मैत्री संपुष्टात आली. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत युती करून एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा करून सरकार स्थापन केले. याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेत नसल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता शिवसेनेला एक-वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं, अशी कुजबूत भाजपमध्ये सुरू झाली आहे. 

मागील 25-30 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना पक्षांची मैत्री होती. मात्र मुख्यमंत्रीपदामुळे ही मैत्री संपुष्टात आली. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. वास्तविक पाहता, सत्तेचे वाटप 50-50 असं म्हटल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. तरी देखील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी विरोधात बसणे पसंत केले. मात्र यामुळे पक्षांतर्गत कुजबूज सुरू झाली आहे. 

मागील पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने मोठ्या प्रमाणात आपले संघटन वाढले होते. या संघटनाचा फायदा भलेही भाजपला विधानसभा निवडणुकीत होऊ शकला नाही. परंतु, तळागाळात भाजप पोहचविण्यास मदत झाली आहे. मात्र आता सत्ता गेल्यामुळे ग्राउंड लेव्हलला तयार झालेले नेटवर्क खंडीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातूनच शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यास काय बिघडले असतं, अशी चर्चा नेते करत आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या संदर्भात वक्तव्य केले. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन परतल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. जनतेने तसा कौल दिला होता. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो, नक्कीच मार्ग निघाला असता असंही ते म्हणाले. 

दरम्यान भाजपमधील या कुजबुजीने भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. मात्र शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, हा निर्णय राज्यातील नेतृत्वाचा की, दिल्लीचा हे अद्याप गुलदस्त्यात आहे.