शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं; भाजपमध्ये कुजबूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 10:50 IST

मागील 25-30 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना पक्षांची मैत्री होती. मात्र मुख्यमंत्रीपदामुळे ही मैत्री संपुष्टात आली. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत युती करून एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा करून सरकार स्थापन केले. याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेत नसल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता शिवसेनेला एक-वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं, अशी कुजबूत भाजपमध्ये सुरू झाली आहे. 

मागील 25-30 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना पक्षांची मैत्री होती. मात्र मुख्यमंत्रीपदामुळे ही मैत्री संपुष्टात आली. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. वास्तविक पाहता, सत्तेचे वाटप 50-50 असं म्हटल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. तरी देखील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी विरोधात बसणे पसंत केले. मात्र यामुळे पक्षांतर्गत कुजबूज सुरू झाली आहे. 

मागील पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने मोठ्या प्रमाणात आपले संघटन वाढले होते. या संघटनाचा फायदा भलेही भाजपला विधानसभा निवडणुकीत होऊ शकला नाही. परंतु, तळागाळात भाजप पोहचविण्यास मदत झाली आहे. मात्र आता सत्ता गेल्यामुळे ग्राउंड लेव्हलला तयार झालेले नेटवर्क खंडीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातूनच शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यास काय बिघडले असतं, अशी चर्चा नेते करत आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या संदर्भात वक्तव्य केले. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन परतल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. जनतेने तसा कौल दिला होता. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो, नक्कीच मार्ग निघाला असता असंही ते म्हणाले. 

दरम्यान भाजपमधील या कुजबुजीने भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. मात्र शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, हा निर्णय राज्यातील नेतृत्वाचा की, दिल्लीचा हे अद्याप गुलदस्त्यात आहे.