शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचे 'कर्जमाफी' हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:24 IST

कर्जमाफी योजनेत अपात्र शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या याद्यांमुळे उघड होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असताना देखील शिवसेनेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. आता शिवसेनेने आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शेतकरी कर्जमाफीचे शस्त्र उगारले आहे. भाजपकडून राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी केल्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. परंतु, अनेकांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपसाठी शिवसेनेने कर्जमाफीसंदर्भात घेतलेली भूमिका अडचणीची ठरू शकते.

राज्यात दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संप केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. परंतु, तत्वत: कर्जमाफी म्हणत त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या. तसेच कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखलही केले होते. परंतु, जाचक अटी आणि नियमांमुळे प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

सरकारने लागू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत काहींना कर्जमाफी मिळाली तर काहींना मिळाली नाही, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोश आहे. हा रोश शिवसेनेने ओळखला असून त्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची यादी जाहीर करा अन्यथा, गाठ शिवसेनेशी आहे, असा दम शिवसेनेकडून भरण्यात आला आहे. विमा कंपन्यांवर काढण्यात आलेल्या मोर्चात ही मागणी करण्यात आली होती.

दरम्यान कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी सहकार विभाग कामाला लागला आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ किती लोकांना झाला आणि किती लोक अपात्र ठरले याची यादी पुढील दोन दिवसांत तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्यात येणार आहे.

कर्जमाफी योजनेत अपात्र शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या याद्यांमुळे उघड होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.