शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचे 'कर्जमाफी' हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:24 IST

कर्जमाफी योजनेत अपात्र शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या याद्यांमुळे उघड होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असताना देखील शिवसेनेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. आता शिवसेनेने आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शेतकरी कर्जमाफीचे शस्त्र उगारले आहे. भाजपकडून राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी केल्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. परंतु, अनेकांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपसाठी शिवसेनेने कर्जमाफीसंदर्भात घेतलेली भूमिका अडचणीची ठरू शकते.

राज्यात दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संप केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. परंतु, तत्वत: कर्जमाफी म्हणत त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या. तसेच कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखलही केले होते. परंतु, जाचक अटी आणि नियमांमुळे प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

सरकारने लागू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत काहींना कर्जमाफी मिळाली तर काहींना मिळाली नाही, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोश आहे. हा रोश शिवसेनेने ओळखला असून त्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची यादी जाहीर करा अन्यथा, गाठ शिवसेनेशी आहे, असा दम शिवसेनेकडून भरण्यात आला आहे. विमा कंपन्यांवर काढण्यात आलेल्या मोर्चात ही मागणी करण्यात आली होती.

दरम्यान कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी सहकार विभाग कामाला लागला आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ किती लोकांना झाला आणि किती लोक अपात्र ठरले याची यादी पुढील दोन दिवसांत तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्यात येणार आहे.

कर्जमाफी योजनेत अपात्र शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या याद्यांमुळे उघड होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.