शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचे 'कर्जमाफी' हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:24 IST

कर्जमाफी योजनेत अपात्र शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या याद्यांमुळे उघड होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असताना देखील शिवसेनेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. आता शिवसेनेने आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शेतकरी कर्जमाफीचे शस्त्र उगारले आहे. भाजपकडून राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी केल्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. परंतु, अनेकांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपसाठी शिवसेनेने कर्जमाफीसंदर्भात घेतलेली भूमिका अडचणीची ठरू शकते.

राज्यात दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संप केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. परंतु, तत्वत: कर्जमाफी म्हणत त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या. तसेच कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखलही केले होते. परंतु, जाचक अटी आणि नियमांमुळे प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

सरकारने लागू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत काहींना कर्जमाफी मिळाली तर काहींना मिळाली नाही, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोश आहे. हा रोश शिवसेनेने ओळखला असून त्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची यादी जाहीर करा अन्यथा, गाठ शिवसेनेशी आहे, असा दम शिवसेनेकडून भरण्यात आला आहे. विमा कंपन्यांवर काढण्यात आलेल्या मोर्चात ही मागणी करण्यात आली होती.

दरम्यान कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी सहकार विभाग कामाला लागला आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ किती लोकांना झाला आणि किती लोक अपात्र ठरले याची यादी पुढील दोन दिवसांत तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्यात येणार आहे.

कर्जमाफी योजनेत अपात्र शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या याद्यांमुळे उघड होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.