शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सत्तेत येताच शिवसेनेचे 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 12:08 IST

सत्तेत आलेल्या शिवसेनेकडून आगामी निवडणुका लक्षात घेता, 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर दिला जात आहे.

मुंबई : गेल्यावेळी सत्तेत असून सुद्धा शिवसेना विरोधकाची भूमिका बजावताना पाहायला मिळत होती. मात्र आता मुख्यमंत्रीपदच शिवसेनेच्या ताब्यात असल्याने, सत्तेत आलेल्या शिवसेनेकडून आगामी निवडणुका लक्षात घेता, 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर दिला जात आहे. या उद्देशाने सर्वच ठिकाणी जिल्हा प्रमुख व आमदार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

अकोला जिल्ह्यात सुद्धा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याच्या अनुषंगाने पक्षातील उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या मुद्यावरही प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती असून, निवडणूक लढणाऱ्या संभाव्य उमेदवारांसाठी 'मायक्रो प्लॅनिंग' करण्यावर भर देण्याची सूचना यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीच्या बॅनरखालीचं काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आत्तापासूनच तयारी सुरु करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोल्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी सुमारे ४२२ पेक्षा अधिक उमेदवारांनी अधिकृत अर्ज स्वीकारले.

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काटेकोर नियोजनाची खूप गरज असते. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वसात घेणे गरजेचे असते. शिवसेनेकडून यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीतील मुद्दे काय असणार यासाठी बैठका घेतल्या जात आहे.