शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका; सामनातून केंद्रसरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:15 IST

आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे.

मुंबई : आधीचे कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांची जी प्रचंड नासाडी केली त्यामुळे खचलेला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील एका महिन्यात मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडेदेखील अस्वस्थ करणारे आहेत. हतबल शेतकरीकेंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा, असे म्हणत शिवसेनेकडून सामानातून केंद्रसरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे. खासकरून मराठवाडय़ातून येणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मराठवाडय़ाच्या प्रत्येक जिल्हय़ात आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे. 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर हतबल झालेले शेतकरी केंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत.

दुबार पेरणीच्या संकटाला तोंड देतानाच पीक विम्यासाठी रांगा लावाव्या लागतात़. नुकसान झाले तर पुन्हा पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात. तर राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही. शिवाय राज्यपालांनी जी मदत जाहीर केली तीही इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नसल्याचे सामनात म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर जाऊन शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यातच राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटू न शकल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हवी असलेली मदत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकरकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी  सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.