शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray Live: शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द; उद्धव ठाकरे याचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:45 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला

“अनेक महिन्यांनंतर समोर आल्यानंतर बोलणार काय हे तुम्ही विचार करत असाल. कोविड काळात जे काही लढलो, प्रशासनाचा अनुभव नव्हता. अशा काळात कोणी तोंड देऊ शकलं नव्हतं, अशा प्रशासन माहित नसलेल्या माणसाच्या वाट्याला सुरूवातीला कोविड आला. त्या दरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते तेव्हा देशातील पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गणना होत होती,” असं मुख्यमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मला भेटणं जमत नव्हतं हे सत्य होतं. जी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतरचे महिने विचित्र होते. त्या काळात कोणाला भेटत नव्हतो हा मुद्दा बरोबर होता. आता सुरू केलं आहे. मी पहिली कॅबिनेट मीटिंग रुग्णालयातून केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द आहेत. ते कदापि वेगळे होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत काही जण अयोध्येलाही जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानभवनात बोलणारा कदाचित मी पहिला मुख्यमंत्री असेन असंही ते म्हणाले.

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. दरम्यान, यावर ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. “शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्री दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. काही जण आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काय मी केलं? २०१४ मध्येही ६३ आमदार निवडून आणले तीदेखील बाळासाहेबांच्या नंतरचीच शिवसेना होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.काल परवा जी काही निवडणूक झाली, त्याच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये आमदार होते. ज्यांना आपण आपलं मानतो, जनता शिवसेनेच्या विचारावर निवडून देतो, त्यांनाही आपल्याला एकत्र ठेवावं लागतं. मला कशाचाही अनुभव नव्हता. मी इच्छेपेक्षा जिद्दीनं करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीनं मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणार म्हणून रणांगणात उतरलो. तिन्ही पक्षांशी बैठक झाली आणि त्यानंतर बाजूला खोलीत गेल्यावर शरद पवारांनी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असं म्हटलं. मी साधा महापालिकेतही गेलो नव्हतो मुख्यमंत्री कसा होणार असं विचारलं. राजकारण कसंही वळण घेऊ शकतं. पण त्यालाही अर्थ हवा, असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना