शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray Live: शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द; उद्धव ठाकरे याचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:45 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला

“अनेक महिन्यांनंतर समोर आल्यानंतर बोलणार काय हे तुम्ही विचार करत असाल. कोविड काळात जे काही लढलो, प्रशासनाचा अनुभव नव्हता. अशा काळात कोणी तोंड देऊ शकलं नव्हतं, अशा प्रशासन माहित नसलेल्या माणसाच्या वाट्याला सुरूवातीला कोविड आला. त्या दरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते तेव्हा देशातील पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गणना होत होती,” असं मुख्यमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मला भेटणं जमत नव्हतं हे सत्य होतं. जी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतरचे महिने विचित्र होते. त्या काळात कोणाला भेटत नव्हतो हा मुद्दा बरोबर होता. आता सुरू केलं आहे. मी पहिली कॅबिनेट मीटिंग रुग्णालयातून केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द आहेत. ते कदापि वेगळे होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत काही जण अयोध्येलाही जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानभवनात बोलणारा कदाचित मी पहिला मुख्यमंत्री असेन असंही ते म्हणाले.

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. दरम्यान, यावर ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. “शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्री दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. काही जण आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काय मी केलं? २०१४ मध्येही ६३ आमदार निवडून आणले तीदेखील बाळासाहेबांच्या नंतरचीच शिवसेना होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.काल परवा जी काही निवडणूक झाली, त्याच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये आमदार होते. ज्यांना आपण आपलं मानतो, जनता शिवसेनेच्या विचारावर निवडून देतो, त्यांनाही आपल्याला एकत्र ठेवावं लागतं. मला कशाचाही अनुभव नव्हता. मी इच्छेपेक्षा जिद्दीनं करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीनं मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणार म्हणून रणांगणात उतरलो. तिन्ही पक्षांशी बैठक झाली आणि त्यानंतर बाजूला खोलीत गेल्यावर शरद पवारांनी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असं म्हटलं. मी साधा महापालिकेतही गेलो नव्हतो मुख्यमंत्री कसा होणार असं विचारलं. राजकारण कसंही वळण घेऊ शकतं. पण त्यालाही अर्थ हवा, असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना