शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

विमा प्रश्नी शिवसेनेचा मोर्चा फक्त राजकीय स्टंटबाजी: जयाजी सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:48 IST

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई - विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असल्याचे आरोप करत शिवसेनेने १७ तारखेला विमा कंपन्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर हा मोर्चा फक्त शिवसेनेची राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे. तर विमा मोर्चे काढून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणी प्रयत्न असल्याचे ही सूर्यवंशी म्हणाले.

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांचा नाही तर शेतक-यांसाठी मोर्चा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र शिवसेनेचा हा मोर्चा फक्त दिखावा असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची मदत करायची असेल तर, लोकसभेमध्ये मोदी सरकारचा बुरखा फाडावा. कारण पीक विमा योजनेच्या माध्यमातून रिलायन्स आणि अन्य कंपनांच्या मालकांना पोसण्याचे काम दिल्लीवाले करत असून हीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या आजूबाजूला बसत असतात, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला.

विमा प्रश्नावर मोर्चे कडून काहीच होणार नाही. शिवसेनेला शेतकऱ्यांची चिंता असेल तर त्यांनी, याविषयी लोकसभेत आवाज उठवावा आणि शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावा. परंतु मतासाठी विम्याचे राजकरण करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घेऊ नयेत असेही जयाजी सूर्यवंशी म्हणाले.