शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

विमा प्रश्नी शिवसेनेचा मोर्चा फक्त राजकीय स्टंटबाजी: जयाजी सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:48 IST

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई - विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असल्याचे आरोप करत शिवसेनेने १७ तारखेला विमा कंपन्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर हा मोर्चा फक्त शिवसेनेची राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे. तर विमा मोर्चे काढून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणी प्रयत्न असल्याचे ही सूर्यवंशी म्हणाले.

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांचा नाही तर शेतक-यांसाठी मोर्चा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र शिवसेनेचा हा मोर्चा फक्त दिखावा असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची मदत करायची असेल तर, लोकसभेमध्ये मोदी सरकारचा बुरखा फाडावा. कारण पीक विमा योजनेच्या माध्यमातून रिलायन्स आणि अन्य कंपनांच्या मालकांना पोसण्याचे काम दिल्लीवाले करत असून हीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या आजूबाजूला बसत असतात, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला.

विमा प्रश्नावर मोर्चे कडून काहीच होणार नाही. शिवसेनेला शेतकऱ्यांची चिंता असेल तर त्यांनी, याविषयी लोकसभेत आवाज उठवावा आणि शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावा. परंतु मतासाठी विम्याचे राजकरण करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घेऊ नयेत असेही जयाजी सूर्यवंशी म्हणाले.