शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खरंच सुशीलकुमार शिंदे काँग्रेसला तारणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 16:39 IST

सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास अडचणीत असलेल्या काँग्रेसकडून शिंदेंचे एकप्रकारे पुनर्वसनच होणार आहे. मात्र त्यांच्या पुनर्वसनाने राज्यात काँग्रेस उभारी घेणार का, असा प्रश्नही काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याची लाटच आली. राहुल राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे नव्या अध्यक्षासाठी चाचपणी सुरू झाली. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहेत.

एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा अद्याप पक्षश्रेष्ठींनी मान्य केला नाही. त्याचवेळी शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास अडचणीत असलेल्या काँग्रेसकडून शिंदेंचे एकप्रकारे पुनर्वसनच होणार आहे. मात्र त्यांच्या पुनर्वसनाने राज्यात काँग्रेस उभारी घेणार का, असा प्रश्नही काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांना २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून पराभवाला सामोरे जावे लागले. तर शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या देखील गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी संघर्ष करताना दिसल्या. खुद्द सोलापुरात शिंदे यांना काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात यश आले नाही. भाजपचे संघटन आणि वंचितचे आव्हान भेदण्यात शिंदे यांना यश आले नाही.

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेससमोर भाजप आणि शिवसेनेप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीचे तुल्यबळ आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीत 'वंचित'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. किंबहुना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची काँग्रेसला थोडक्यात हुलकावणी मिळाली. शिंदे यांच्या पुनर्वसनामुळे वंचितशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसला सोपं जाईल अशी शक्यता आहे. मात्र काँग्रेसपासून दुरावत चाललेल्या मुस्लीम मतदारांना परत कसं आणायचं यावर शिंदे यांना काम करावे लागेल.

दुसरीकडे विरोधकांशी लढत असताना पक्ष संघटनेवर देखील शिंदे यांना भर द्यावा लागणार आहे. २०१४ पासून अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्याचा परिणाम सहाजिकच पक्षावर झाला आहे. यातून मार्ग काढत काँग्रेसला शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी मजबूत होत असल्याचे चित्र असून यावर देखील शिंदे यांना काम करावे लागणार आहे. तर राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने देशातील काँग्रेस संघटनावर शिंदे यांना लक्ष ठेवावे लागेल. एकूणच शिंदे यांचे पुनर्वसन झाले तरी त्यातून काँग्रेसला राज्यात उभारी मिळणार का, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.