शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Politics: “यांची डील फिस्कटली म्हणून प्रकल्प गेला, पुरावे समोर मांडू”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 16:12 IST

टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला. आधीच्या सरकारची डील झाली नाही. याबाबत पुरावे हाती लागल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात येत आहे. यातच आता शिंदे गटातील एका आमदारांना यांची डील झाली नाही म्हणून महाराष्ट्रातून प्रकल्प गेला, असा आरोप करताना आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत. ते सर्वांसमोर मांडू, असा इशाराही दिला आहे. 

शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी देखील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला. सदर प्रकल्प खराब पाय असणाऱ्या मागच्या सरकारमुळे गुजारातमध्ये गेला. आमचे सरकार येऊन फक्त दोनच महिने झालेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई जबाबदार आहेत, असा आरोप शिरसाट यांनी यावेळी केला. 

हा प्रकल्प आधीच्या सरकारच्या डिलिंगमुळे बाहेर गेला

हा प्रकल्प आधीच्या सरकारच्या डिलिंगमुळे बाहेर गेला, असा दावा करत शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकल्प आला कधी? एखादी कंपनी स्थापन करायची असेल, तर कंपनीचा मालक वर्षभरापासून नियोजन करत असतो. तो यांना भेटला असेलच. शिंदे गट-भाजपचे सरकार येऊन दोन महिने झाले. दोन महिन्यांपूर्वी कंपनीकडून सर्व प्रक्रिया केली असेल. पण मला मिळालेल्या माहितीनुसार टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला आहे. आधीच्या राज्यकर्त्यांची डील झाली नाही. यांची डील झाली नाही, म्हणून हा प्रकल्प इथून गेला आहे, असा मोठा दावा शिरसाट यांनी केला. 

आमच्या हाती लागलेले पुरावे सादर करू

हा प्रकल्प जाऊच नये, अशाच मताचे आम्ही होतो. हा प्रकल्प दोन महिन्यांच्या कालावधीत गेलेला नाही. यांनी त्यांच्या फायद्याचं गणित बघितले.  कंपनीवाला तुमच्यासाठी कंपनी टाकत नाही. तो त्याच्या फायद्यासाठी कंपनी टाकत असतो. पण प्रत्येक गोष्टीत डीलिग झाल्याचे समोर येतेय. आता ते ज्या बोंबा मारतायत, त्यावर आम्ही पुरावे समोर मांडू. आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत, असा इशारा शिरसाट यांनी दिला.

दरम्यान, नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना, मी स्पष्टपणे सांगतो की माझ्या नाराजीच्या बातम्या दरवेळी येतात आणि मला त्याचा त्रास होतो. दरवेळी मला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागते. मी एकनाथ शिंदेंना याबाबत भेटलो. या अफवा थांबवा, नाहीतर मला मानहानीचा दावा दाखल कारवा लागेल, असा इशारा देत, मंत्रीपद, उपनेतेपद या अपेक्षेने गेलो नाही, तर एका वेगळ्या ध्येयाने गेलो आहे. आजही एकनाथ शिंदेंसोबत आहे, उद्याही आहे आणि परवाही राहणार आहे, असे शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Shirsatसंजय शिरसाट