शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra Politics: “शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत”; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:15 IST

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला राहुल शेवाळेंनी लगावला.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. शिवसेनाप्रमुख हे पद फक्त बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसते. त्यांच्या पश्चात ते पद आम्ही गोठवले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण केले. तशी पक्षाच्या घटनेतही नोंद केली गेली. पक्षप्रमुख पदाचे काम मी गेली काही वर्ष पाहत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. 

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्ष सदस्यत्वाचे आमचे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे सर्वात आधी १६ जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल द्यावा अशी आमची मागणी आहे. कायदे तज्त्रांच्या मते त्या १६ सदस्यांच्या अपात्रेची शक्यताच जास्त आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. याला शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. तसेच उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. 

शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत

२०१३ नंतर शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आला, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेवर आक्षेप घेतला. उद्धव ठाकरेंनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची असल्याचा पलटवार राहुल शेवाळेंनी केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार ठाकरेंची नेमणूक झाली तर त्याची माहिती द्यावी. शिवसेनेतील इतर पदे कशी भरली याचीही माहिती द्यावी. विभाग, गटप्रमुख ही पदे भरताना कुठे जाहिराती दिली, किती अर्ज आले हेही दाखवावे, असे आव्हान राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंना दिले. 

दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला लगावताना, २०१३ आणि २०१८ नंतर शिवसेनाप्रमुख पद तसेच ठेवत शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण केले. अनिल देसाई यांनी जी प्रक्रिया सांगितली त्याप्रमाणे निवडणूक होते, अर्ज मागविले जातात. २०१३ आणि २०१८ मध्ये कुणी अर्ज केला, पक्षप्रमुख पदासाठी तेव्हा आमचा उद्धव ठाकरेंना सर्वांचा पाठिंबा होता. मात्र नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखासाठी मतदान झाले का? अशी विचारणा राहुल शेवाळे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Shewaleराहुल शेवाळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना