शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 16:44 IST

देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली होती.

Maharashtra Politics: अलीकडेच भर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सर्वांसमोर चांगलेच सुनावल्याची बातमी आली होती. यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटावर भाजपचे असलेले वर्चस्व, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र, त्या बैठकीत नेमके काय घडले, देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय सांगितले, याबाबत खुद्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली असून, खडाजंगी वगैरे काही झाली नसल्याचे सांगत या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची बोलण्याची पद्धत आणि माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मी बोलतो ते एकदम रफ टफमध्ये, ते अगदी चौकटीत बसणारे बोलतात. ते वेल एज्युकेटेड आहेत, अॅडव्होकेट आहेत. धोरणात्मक निर्णय थेट माध्यमांजवळ जाहीर करु नये, असे  देवेंद्र फडणवीसांनी मला हसता हसता सांगितले. मी ही माझी बाजू त्यावेळी त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर त्यांनी कोणताही निर्णय जाहीर करताना आमच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली.  त्यांच्या बोलण्याचा उद्देश हा होता की बजेटमध्ये आपण त्याची तरतूद केली असती, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

बैठकीत कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही

त्यावेळी धोरणात्मक निर्णयाची घोषणा केलेली नव्हती. फक्त माझ्या मनातला विचार माध्यमांजवळ बोलून दाखवला होता. पण विविध माध्यमांनी शासन निर्णय म्हणून संबंधित वृत्त चालवले. त्यामुळे चुकीचा मेसेज गेला. पण शेवटी आम्ही आमच्या मनातील कल्पना जरी सांगितली तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय पुढे काही होत नसते, हे सत्य आहे. मागच्या आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा हसता हसता त्यांनी मला सल्ला दिला . कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. माध्यमांनीही योजनेचा आवाका आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन कृषी विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त चालवले. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता? असा सवाल करत फडणवीसांनी सत्तारांना धारेवर धरले. देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस