शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 16:44 IST

देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली होती.

Maharashtra Politics: अलीकडेच भर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सर्वांसमोर चांगलेच सुनावल्याची बातमी आली होती. यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटावर भाजपचे असलेले वर्चस्व, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र, त्या बैठकीत नेमके काय घडले, देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय सांगितले, याबाबत खुद्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली असून, खडाजंगी वगैरे काही झाली नसल्याचे सांगत या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची बोलण्याची पद्धत आणि माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मी बोलतो ते एकदम रफ टफमध्ये, ते अगदी चौकटीत बसणारे बोलतात. ते वेल एज्युकेटेड आहेत, अॅडव्होकेट आहेत. धोरणात्मक निर्णय थेट माध्यमांजवळ जाहीर करु नये, असे  देवेंद्र फडणवीसांनी मला हसता हसता सांगितले. मी ही माझी बाजू त्यावेळी त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर त्यांनी कोणताही निर्णय जाहीर करताना आमच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली.  त्यांच्या बोलण्याचा उद्देश हा होता की बजेटमध्ये आपण त्याची तरतूद केली असती, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

बैठकीत कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही

त्यावेळी धोरणात्मक निर्णयाची घोषणा केलेली नव्हती. फक्त माझ्या मनातला विचार माध्यमांजवळ बोलून दाखवला होता. पण विविध माध्यमांनी शासन निर्णय म्हणून संबंधित वृत्त चालवले. त्यामुळे चुकीचा मेसेज गेला. पण शेवटी आम्ही आमच्या मनातील कल्पना जरी सांगितली तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय पुढे काही होत नसते, हे सत्य आहे. मागच्या आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा हसता हसता त्यांनी मला सल्ला दिला . कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. माध्यमांनीही योजनेचा आवाका आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन कृषी विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त चालवले. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता? असा सवाल करत फडणवीसांनी सत्तारांना धारेवर धरले. देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस