शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 16:44 IST

देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली होती.

Maharashtra Politics: अलीकडेच भर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सर्वांसमोर चांगलेच सुनावल्याची बातमी आली होती. यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटावर भाजपचे असलेले वर्चस्व, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र, त्या बैठकीत नेमके काय घडले, देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय सांगितले, याबाबत खुद्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली असून, खडाजंगी वगैरे काही झाली नसल्याचे सांगत या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची बोलण्याची पद्धत आणि माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मी बोलतो ते एकदम रफ टफमध्ये, ते अगदी चौकटीत बसणारे बोलतात. ते वेल एज्युकेटेड आहेत, अॅडव्होकेट आहेत. धोरणात्मक निर्णय थेट माध्यमांजवळ जाहीर करु नये, असे  देवेंद्र फडणवीसांनी मला हसता हसता सांगितले. मी ही माझी बाजू त्यावेळी त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर त्यांनी कोणताही निर्णय जाहीर करताना आमच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली.  त्यांच्या बोलण्याचा उद्देश हा होता की बजेटमध्ये आपण त्याची तरतूद केली असती, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

बैठकीत कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही

त्यावेळी धोरणात्मक निर्णयाची घोषणा केलेली नव्हती. फक्त माझ्या मनातला विचार माध्यमांजवळ बोलून दाखवला होता. पण विविध माध्यमांनी शासन निर्णय म्हणून संबंधित वृत्त चालवले. त्यामुळे चुकीचा मेसेज गेला. पण शेवटी आम्ही आमच्या मनातील कल्पना जरी सांगितली तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय पुढे काही होत नसते, हे सत्य आहे. मागच्या आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा हसता हसता त्यांनी मला सल्ला दिला . कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. माध्यमांनीही योजनेचा आवाका आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन कृषी विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त चालवले. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता? असा सवाल करत फडणवीसांनी सत्तारांना धारेवर धरले. देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस