शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Sanjay Raut: सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 07:11 IST

आधी दाखल झाला हक्कभंग; नंतर स्थापन झाली समिती, सत्तांतराला आठ महिने होऊनही विधिमंडळाच्या समित्याच नाहीत

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  सत्ताधारी पक्षांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला; पण हक्कभंगाची पुढील कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीच अस्तित्वात नसल्याचे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच घाईघाईत हक्कभंग समिती स्थापन करण्याची धावपळ सरकार आणि विधिमंडळ स्तरावर सुरू झाली. या समितीवर सर्वपक्षीय आमदारांचा समावेश असल्याने सर्व पक्षांकडून आमदारांची नावे मागवून अखेर समिती स्थापन करण्यात आली.

 राज्यात सत्ताबदल होऊन आठ महिने उलटून गेले तरी विधिमंडळाच्या  कोणत्याही समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही. बुधवारी सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) - भाजप सरकारने  संजय राऊत यांच्याविरोधात दोन्ही सभागृहांमध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्यानंतर या समित्यांची गरज राज्य सरकार आणि विधिमंडळाला वाटू लागली. त्यानंतर तातडीने पाऊले उचलण्यात आली. 

घाईघाईत हक्कभंग समितीची स्थापना संजय राऊत यांच्या हक्कभंगाचा विषय विधिमंडळात आल्यानंतर विधिमंडळाने तातडीने रात्री हक्कभंग समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष राहुल कुल, तर सदस्य म्हणून अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नीतेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाट, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनील केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. 

विधिमंडळाच्या ३८ समित्याविधिमंडळाच्या विविध कार्यासाठी ३८ समित्या आहेत. विधिमंडळाच्या कामकाजाची पूर्तता करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांचा समावेश असलेल्या या समित्या स्थापन केल्या जातात. या समित्या सरकारवर अंकुश ठेवण्याबरोबर जनहितासाठीही महत्त्वाच्या असतात. लोकहिताचा एखादा विषय घेऊन त्यावरही या समित्या काम करतात. 

या आहेत प्रमुख समित्याnलोकलेखा समितीnविशेषाधिकार समिती nसार्वजनिक उपक्रम समितीnअंदाज समितीnअनुसूचित जाती कल्याण समितीnविमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीnपंचायती राज समितीnरोजगार हमी योजना समितीnअनुसूचित जमाती कल्याण समिती

यातील या बहुतांश समित्यावर सत्ताधारी पक्षाचा आमदार अध्यक्ष असतो; मात्र अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर विरोधी पक्षाचा आमदार अध्यक्ष असतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतvidhan sabhaविधानसभाEknath Shindeएकनाथ शिंदे