शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

"बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या भाषण, लेखनातून शिवरायांवर केला तेवढा अन्याय अन्य कुणी केला नाही’', शरद पवारांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:10 IST

Sharad Pawar: बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर इतर कुणी केलेला नाही, असं माझं मत आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले लिखाण आणि व्याख्यानांवर टीका केली आहे. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर इतर कुणी केलेला नाही, असं माझं मत आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट तर काहींनी धाधांत खोटी माहिती दिली. मात्र श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या इतिहासकारांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, असे कौतुकौद्गारही शरद पवार यांनी काढले.

श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या शिवचरित्र आणि विचार प्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्याला छत्रपती शाहू महाराज तसेच माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी आपलं मत मांडलं. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर अन्य कुणी केलेला नाही, असं माझं मतं आहे.

अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. त्या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या अनेकांना पटणाऱ्या नाहीत. मात्र श्रीमंत कोकाटे यांनी हे काम अगदी चांगल्या पद्धतीने केलं आहे. शिवछत्रपतींचं चित्र काही जणांनी धर्मांध आणि संकुचित पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीमंत कोकाटे यांनी सत्य मांडलं आहे. तसेच अशाच प्रकारचं काम गोविंद पानसरे यांनी केलं आहे, असे शरद पवार म्हणाले.

काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट तर काहींनी धाधांत खोटी माहिती दिली. मात्र कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे इतरांपेक्षा वेगळं होतं. कारण त्यांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य झालं नाही, तर ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं, असेही शरद पवार म्हणाले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज