शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी देण्याची शरद पवार यांची मोदींकडे मागणी

By admin | Updated: March 16, 2017 03:41 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून, डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सुरेश भटेवरा , नवी दिल्लीमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून, डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याने बजावलेल्या नोटिसांची टांगती तलवार त्वरीत थोपवा,अबकारी विभागातर्फे इथेनॉलला एक्साइज करातून मिळणारी सूट सरकारने चालू वर्षापासून रद्द केली आहे, ती पुन्हा लागू करा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा निर्णय लवकरात लवकर जाहीर करा, या तीन मागण्याही शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केल्या. कारखान्यांना आकारण्यात येणाऱ्या प्राप्तिकराचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य तो मार्ग लवकरात लवकर काढू आणि अन्य दोन मागण्यांचाही सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर विचार करू असे आश्वासन पंतप्रधानांनी पवारांना दिले. ऊ स उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवलेला उचित व योग्य दरापेक्षा (एफआरपी) अधिक भाव देणाऱ्या महाराष्ट्र व गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाने जवळपास ५ हजार कोटी रुपये कर भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत, याकडे पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. ऊ साला अधिक दर देण्याची कारखान्यांची क्षमता असेल तर त्यांनी प्राप्तिकर भरायलाच हवा, असा त्या विभागाचा आग्रह आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने हवालदिल झाले आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगले भाव दिले हा त्यांचा गुन्हा नसून याबाबत सरकारचा निर्णय पूर्णत: चुकला आहे. कारखान्यांकडे सध्या इतकी रक्कम भरण्यासाठी पैसा नाही. या गोष्टींचा विचार करून नोटिसा त्वरित थोपवाव्यात, अशी आग्रही मागणी पवारांनी मोदींकडे केली.