शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

‘उत्तराधिकारी’ दिल्लीसाठीही महत्त्वाचा! शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी कुणाशीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 08:46 IST

राजकीय महानाट्यावर कसा पडदा पडणार याकडे देशाचे लक्ष 

सुनील चावके मुंबई/नवी दिल्ली  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम राहिल्यास त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हा प्रश्न केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर राष्ट्रवादीच्या दिल्लीतील राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. 

दिल्लीत गेली चार दशके साखरपेरणी करणारे शरद पवार यांची जागा घेण्याइतकी क्षमता आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणातच नाही. पवार यांची सावली मानले जाणारे प्रफुल्ल पटेल तसेच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे उत्तम नेटवर्किंग असले तरी दिल्लीच्या  राजकारणात शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी करण्यासाठी ते पुरेसे नाही.

जबाबदाऱ्यांच्या त्रिभाजनाचा पर्यायविचारधारा आणि पक्षभेद विसरून सर्व राष्ट्रीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याची क्षमता सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये असली तरी ते विश्वासार्हतेच्या बाबतीत शरद पवार यांच्या तुलनेत कमी पडतात. अशा स्थितीत शरद पवार सध्या एकट्याने सांभाळत असलेल्या राज्याच्या तसेच राष्ट्रीय नेतृत्वाच्या जबाबदारीचे अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांमध्ये त्रिभाजन करावे लागेल.

आगामी लोकसभा निवडणूक शेवटची? पुढच्या वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होण्यापूर्वीची कदाचित शेवटची निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. ही निवडणूक होईपर्यंत राज्यातील आणि देशातील राजकारणात आपले महत्त्व शाबूत ठेवण्याला शरद पवार यांनी प्राधान्य दिले आहे. २०२४ साली सत्तेची बाजी विरोधकांच्या हाती आल्यास पवार यांना सर्वसंमतीने पंतप्रधान होण्याची अनपेक्षित संधी मिळू शकेल. 

‘अदृश्य’ दबाव झुगारण्यासाठी धडपडराज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करावी म्हणून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर, विशेषतः अजित पवार यांच्यावर ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा अदृश्य दबाव असल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसवर दरदिवशी वाढत जाणारा अदृश्य दबाव परतावून लावण्यासाठी शरद पवार यांना कधी केंद्रातील मोदी सरकारची मर्जी सांभाळण्यासाठी तर कधी विरोधकांना खूश करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सतत कोलांटउड्या माराव्या लागल्या असून, अनेकदा परस्परविरोधी विधाने करावी लागली आहेत. 

...तर राष्ट्रवादीचीही अवस्था शिवसेनेसारखीच? अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन तृतीयांशापेक्षा जास्त आमदार फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाजपची रणनीती आहे. तसे झाल्यास खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची असा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात उपस्थित होईल. एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जशी अवस्था झाली, तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस