शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"हे ‘महायुती’ नव्हे, तर ‘महाभानगडी’ सरकार"; शरद पवार गटाच्या नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:04 IST

"हे सरकार म्हणजे एक गाडी, चार ड्रायव्हर आणि ब्रेक कोणाच्याच हाती नाही"

Sharad Pawar NCP vs Mahayuti : फडणवीस सरकार हे महाराष्ट्रासाठी नसून दिल्लीच्या इशाऱ्यावर चालते. राज्य सरकारमध्ये सध्या एका पाठोपाठ एक मंत्री नाराज होत आहेत. उद्योग मंत्री म्हणतात की आमच्या खात्यातील निर्णय आम्हाला विचारून घेत नाहीत. परिवहन मंत्री म्हणतात की माझ्या खात्यात कोण बसवलं जातं मलाच विचारत नाहीत आणि मुख्यमंत्री मात्र म्हणतात मी ठरवतो कोणाला थारा द्यायचा आणि कोणाला नाही. मग या सरकारमध्ये नेमकं ठरवतो कोण? हा सारा प्रकार पाहता हे सरकार ‘महायुती’ नाही तर ‘महाभानगडी’ झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात टीका केली.

"मंत्रीच जर अस्वस्थ असतील, तर सामान्य जनतेच्या प्रश्नांवर विचार करायला कोणाला वेळ आहे? मुख्यमंत्री साहेब, जेव्हा तुम्हाला खुर्ची मिळाली नव्हती तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता आणि आता खुर्ची मिळाल्यावर सगळ्यांना अस्वस्थ करून ठेवलंय. ‘एक गाडी, चार ड्रायव्हर आणि ब्रेक कोणाच्याच हातात नाही. आज या सरकारमध्ये कोण निर्णय घेतं आणि कोण पाळतं, हे कोणालाच माहीत नाही. हे सरकार म्हणजे एकाच गाडीत चार ड्रायव्हर बसल्यासारखं आहे, पण ब्रेक कोणाच्या हातात आहे हे अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे निर्णय कधी अचानक थांबतात, कधी फूल स्पीडने कुणाला तरी चिरडून जातात आणि शेवटी महाराष्ट्राची जनता विचारते हे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की दिल्लीसाठी?" असा खोचक सवाल अमोल मातेले यांनी केला.

"महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येक जबाबदार नागरिकाने या हुकूमशाही सरकारविरोधात आवाज उठवायला हवा. राज्याच्या निर्णयांवर दिल्लीचा अघोषित ताबा असून महाराष्ट्राची सत्तासंस्था कशी हाताळायची हे दिल्लीच्या नेत्यांकडून ठरवलं जातं. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. हे सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेणार नाही, तर अराजकतेच्या दिशेने ढकलणार आहे. आता जनतेला ठरवायचं आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी उभं राहायचं की दिल्लीच्या बाहुल्यांचा खेळ पाहायचा," असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :MahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार