शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी शब्द पाळला; बारामतीहून पुणे वेधशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी पाठवली ५० किलो साखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:58 IST

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होतेहवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

पुणे, दि. 23- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठवली आहे. आज दुपारी ४ वाजता अंकुश काकडे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामतीहून आलेली साखर हवामान खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देणार आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस न झाल्याने त्याच्यावर मोठी टीका होत होती. एका शेतकऱ्याने तशी तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती. हवामान विभागाने गेल्या आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवस संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर शरद पवार यांनी हा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर हवामान तज्ञांच्या तोंडात घालेन असं म्हंटलं होतं. 

20 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली होती. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली होती. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी लगावला होता. 

कर्जमाफीच्या धोरणावरही केली होती टीकाराज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही, असं शरद पवार म्हणाले होते. मान्सून लांबला आहे. परिणामी राज्याच्या काही भागात दुबार पेरणीची वेळ असून, ते आर्थिकदृष्ट्या संकटच आहे. शेतकरी सध्या या संकटातून जात आहेत. मलाही या सगळ्या गोष्टींची भयंकर काळजी होती, परंतु हवामान क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात चांगला पाऊस पडेल. ते खरे ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असं शरद पवार त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.तसंच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झालं आहे, असं पत्र बँकेत दिलं आहे, असं मला कुठेही दिसलं नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.