शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी शब्द पाळला; बारामतीहून पुणे वेधशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी पाठवली ५० किलो साखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:58 IST

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होतेहवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

पुणे, दि. 23- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठवली आहे. आज दुपारी ४ वाजता अंकुश काकडे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामतीहून आलेली साखर हवामान खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देणार आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस न झाल्याने त्याच्यावर मोठी टीका होत होती. एका शेतकऱ्याने तशी तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती. हवामान विभागाने गेल्या आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवस संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर शरद पवार यांनी हा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर हवामान तज्ञांच्या तोंडात घालेन असं म्हंटलं होतं. 

20 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली होती. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली होती. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी लगावला होता. 

कर्जमाफीच्या धोरणावरही केली होती टीकाराज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही, असं शरद पवार म्हणाले होते. मान्सून लांबला आहे. परिणामी राज्याच्या काही भागात दुबार पेरणीची वेळ असून, ते आर्थिकदृष्ट्या संकटच आहे. शेतकरी सध्या या संकटातून जात आहेत. मलाही या सगळ्या गोष्टींची भयंकर काळजी होती, परंतु हवामान क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात चांगला पाऊस पडेल. ते खरे ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असं शरद पवार त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.तसंच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झालं आहे, असं पत्र बँकेत दिलं आहे, असं मला कुठेही दिसलं नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.