शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शरद पवारांनी शब्द पाळला; बारामतीहून पुणे वेधशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी पाठवली ५० किलो साखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:58 IST

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होतेहवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

पुणे, दि. 23- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठवली आहे. आज दुपारी ४ वाजता अंकुश काकडे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामतीहून आलेली साखर हवामान खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देणार आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस न झाल्याने त्याच्यावर मोठी टीका होत होती. एका शेतकऱ्याने तशी तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती. हवामान विभागाने गेल्या आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवस संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर शरद पवार यांनी हा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर हवामान तज्ञांच्या तोंडात घालेन असं म्हंटलं होतं. 

20 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली होती. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली होती. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी लगावला होता. 

कर्जमाफीच्या धोरणावरही केली होती टीकाराज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही, असं शरद पवार म्हणाले होते. मान्सून लांबला आहे. परिणामी राज्याच्या काही भागात दुबार पेरणीची वेळ असून, ते आर्थिकदृष्ट्या संकटच आहे. शेतकरी सध्या या संकटातून जात आहेत. मलाही या सगळ्या गोष्टींची भयंकर काळजी होती, परंतु हवामान क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात चांगला पाऊस पडेल. ते खरे ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असं शरद पवार त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.तसंच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झालं आहे, असं पत्र बँकेत दिलं आहे, असं मला कुठेही दिसलं नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.