शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Sharad Pawar in Kolhapur: कोल्हापूरच्या निकालाने माझी काळजी वाढविली; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांवर कडवा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 22:17 IST

राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले परंतू सामान्यांची सेवा कधी सोडली नाही, असे ते म्हणाले.

देशावर एवढ्या राजसत्तांची आक्रमणे झाली, चंद्रगुप्त मौर्य सारख्यांची साम्राज्य उभी होती. परंतू तीनशे चारशे वर्षे झाली तरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आजही घेतले जाते. जिजाऊंच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांनी चोहुबाजुंनी सर्व मुघल साम्राज्यांशी लढले, समाजातील सर्व घटकांचा विचार केला. आज देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आली आहे. भाजपा जिथे जिथे सत्तेत आली तिथे तिथे अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले परंतू सामान्यांची सेवा कधी सोडली नाही. या कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठविण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनीच केला. कोल्हापूरचा निकाल लागला आणि माझी काळजी वाढली, कोल्हापुरच्या निकालाने देशात संदेश गेला, असे पवार म्हणाले. 

देशाला दिशा देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारमध्ये आंबेडकर हे वीज मंत्री होते, त्यांनी आपला देश पुढे नेण्यासाठी एक संकल्पना मांडली. विजेच्या ग्रीडची. ज्या राज्यांमध्ये जास्त वीज आहे, त्या राज्यांची वीज कमी वीज असलेल्या राज्यांना जोवर वळविली जात नाही, तोवर या राज्यांचा विकास होऊ शकत नाही. त्यांनी देशाला ग्रीडची भेट दिली, निर्णय घेतला, असे पवार म्हणाले. 

दिल्लीत हिंसाचार झाला, गृहखाते अपयशी ठरले. दिल्लीत काही घडले की त्याचा संदेश जगात जातो. कालच्या घटनेने भारतात अस्थिर वातावरण आहे, हा संदेश गेला. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर हल्ले केले. त्यांना देशात अन्य ठिकाणी जावे लागले. या सिनेमाचा हेतू हा होता, की तिथे सामाजिक वातावरण बिघडवायचे आणि त्यावरून तिथे मतांचा जोगवा मागायचा. अनेकांना माहिती नाहीय तिथे काय चालले आहे, अशी टीका पवार यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस