शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

Sharad Pawar in Kolhapur: कोल्हापूरच्या निकालाने माझी काळजी वाढविली; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांवर कडवा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 22:17 IST

राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले परंतू सामान्यांची सेवा कधी सोडली नाही, असे ते म्हणाले.

देशावर एवढ्या राजसत्तांची आक्रमणे झाली, चंद्रगुप्त मौर्य सारख्यांची साम्राज्य उभी होती. परंतू तीनशे चारशे वर्षे झाली तरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आजही घेतले जाते. जिजाऊंच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांनी चोहुबाजुंनी सर्व मुघल साम्राज्यांशी लढले, समाजातील सर्व घटकांचा विचार केला. आज देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आली आहे. भाजपा जिथे जिथे सत्तेत आली तिथे तिथे अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले परंतू सामान्यांची सेवा कधी सोडली नाही. या कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठविण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनीच केला. कोल्हापूरचा निकाल लागला आणि माझी काळजी वाढली, कोल्हापुरच्या निकालाने देशात संदेश गेला, असे पवार म्हणाले. 

देशाला दिशा देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारमध्ये आंबेडकर हे वीज मंत्री होते, त्यांनी आपला देश पुढे नेण्यासाठी एक संकल्पना मांडली. विजेच्या ग्रीडची. ज्या राज्यांमध्ये जास्त वीज आहे, त्या राज्यांची वीज कमी वीज असलेल्या राज्यांना जोवर वळविली जात नाही, तोवर या राज्यांचा विकास होऊ शकत नाही. त्यांनी देशाला ग्रीडची भेट दिली, निर्णय घेतला, असे पवार म्हणाले. 

दिल्लीत हिंसाचार झाला, गृहखाते अपयशी ठरले. दिल्लीत काही घडले की त्याचा संदेश जगात जातो. कालच्या घटनेने भारतात अस्थिर वातावरण आहे, हा संदेश गेला. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर हल्ले केले. त्यांना देशात अन्य ठिकाणी जावे लागले. या सिनेमाचा हेतू हा होता, की तिथे सामाजिक वातावरण बिघडवायचे आणि त्यावरून तिथे मतांचा जोगवा मागायचा. अनेकांना माहिती नाहीय तिथे काय चालले आहे, अशी टीका पवार यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस