शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

OBC आरक्षणावर शरद पवारांनी रातोरात निर्णय घेतला अन्...; नामदेवराव जाधवांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:57 IST

मराठा समाजाची दयनीय परिस्थिती पाहिली की आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के मराठा आहेत. आमच्यातले काही पुढारलेले असतील पण त्यांच्याकडे बघून इतरांचे मूल्यमापन करू शकत नाही असं नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

मुंबई – शरद पवारांनी ओबीसी आरक्षण १४ वरून थेट २७ टक्क्यांवर नेले, तेव्हा खरा अधिकार हा मराठ्यांचा होता. पण मराठ्यांना डावलून तेली, माळी यांचा ओबीसीत समावेश केला. पण तेली, माळी यांना एका सहीने ओबीसीत घेतले, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण हे नियम मराठ्यांना लावले जातात. ते कोणते नियम या समाजाला लावले होते. यावर श्वेतपत्रिका काढावी. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. २३ मार्च हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात पिढ्यानपिढ्या काळा दिवस असणार आहे असं सांगत मराठी वक्ते व लेखक नामदेवराव जाधव यांनी पवारांवर गंभीर आरोप लावले.

नामदेवराव जाधव म्हणाले की, २३ मार्च १९९४ ला शरद पवार मुख्यमंत्री असताना हा रातोरात झालेला निर्णय आहे. २ जातींना ओबीसीत समावेश करून घेतले. ओबीसी यादीत तेली, माळी घेतल्यानंतर १९९४ पासून आतापर्यंत भरती झालेल्यांमुळे मराठ्यांची लाखो पोरं आज बेरोजगार झालेत. हा निर्णय पवारांच्या कारकिर्दीत झाला. कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला? आम्ही पुरोगामी आहोत ते दाखवण्याच्या नादात मराठ्यांचे भविष्य गाडले गेले असं त्यांनी म्हटलं.

तसेच जेव्हा एखाद्यात राज्यात निर्णय घेतला जातो, तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येतो. जर मान्य केले तर ते राज्यपालांकडे जाते आणि त्यावर जीआर काढला जातो. त्यावेळी काय काय झाले, कसा प्रस्ताव मांडला, कुणी मते मांडली, कुणी विरोध दर्शवला हे सगळे मराठा समाजासमोर यावे यासाठी श्वेतपत्रिका काढावी. रातोरात निर्णय घेतल्याने ५ कोटी मराठा समाजाचे नुकसान झाले. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. त्यानंतर युतीचे सरकार राज्यात आले. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या दबावामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा २७ वरून ३० टक्क्यांवर आली असंही नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाची दयनीय परिस्थिती पाहिली की आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के मराठा आहेत. आमच्यातले काही पुढारलेले असतील पण त्यांच्याकडे बघून इतरांचे मूल्यमापन करू शकत नाही. आम्हाला निकषांच्या फेऱ्यात का अडकवले जातंय..? ओबीसीत माळी येतात, त्या माळी समाजात मुस्लीम समाजाचे बागवान लोकं येतात. हेदेखील आम्हाला माहिती नव्हते. १९९४ नंतर मराठ्यांच्या सुविधा बंद झाल्या तेव्हापासून आम्हाला हे कळायला लागले. १९९३-९४ पर्यंत मराठ्यांना मोफत शिक्षण मिळत होते, त्यानंतर हळूहळू उत्पन्न घटत गेले, त्यानंतर समाज जागा व्हायला लागला असंही नामदेवराव जाधव यांनी म्हटलं.

काय आहेतनेमका आरोप?

शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण गेले, ओबीसी यादीत १८१ नंबरवर मराठा समाजाचा उल्लेख होता. त्यावर फुल्ली मारली गेली. १८२ तेली, १८३ माळी होते, त्यांना आरक्षणात घेतले. जेव्हा ओबीसींची पहिली यादी बनली त्यात १८० जातींचा समावेश होता. जेव्हा सुधारित यादी तयार केली त्यात १८१ मराठा, १८२ तेली, १८३ माळी होते. मग १८१ नंबर गायब कसा झाला? ओबीसींना आधी ११ टक्के आरक्षण होते, ते ३ टक्क्यांनी वाढवून १४ टक्के केले. तेव्हा लेवा पाटील, लेवा कुणबी, लेवा पाटीदार यांचे कुठलेही आर्थिक, सामाजिक निकष सिद्ध झाले होते. शरद पवारांनी १४ वरून हे २७ टक्क्यांवर आरक्षण नेले असं नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारOBCअन्य मागासवर्गीय जाती