शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

OBC आरक्षणावर शरद पवारांनी रातोरात निर्णय घेतला अन्...; नामदेवराव जाधवांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:57 IST

मराठा समाजाची दयनीय परिस्थिती पाहिली की आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के मराठा आहेत. आमच्यातले काही पुढारलेले असतील पण त्यांच्याकडे बघून इतरांचे मूल्यमापन करू शकत नाही असं नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

मुंबई – शरद पवारांनी ओबीसी आरक्षण १४ वरून थेट २७ टक्क्यांवर नेले, तेव्हा खरा अधिकार हा मराठ्यांचा होता. पण मराठ्यांना डावलून तेली, माळी यांचा ओबीसीत समावेश केला. पण तेली, माळी यांना एका सहीने ओबीसीत घेतले, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण हे नियम मराठ्यांना लावले जातात. ते कोणते नियम या समाजाला लावले होते. यावर श्वेतपत्रिका काढावी. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. २३ मार्च हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात पिढ्यानपिढ्या काळा दिवस असणार आहे असं सांगत मराठी वक्ते व लेखक नामदेवराव जाधव यांनी पवारांवर गंभीर आरोप लावले.

नामदेवराव जाधव म्हणाले की, २३ मार्च १९९४ ला शरद पवार मुख्यमंत्री असताना हा रातोरात झालेला निर्णय आहे. २ जातींना ओबीसीत समावेश करून घेतले. ओबीसी यादीत तेली, माळी घेतल्यानंतर १९९४ पासून आतापर्यंत भरती झालेल्यांमुळे मराठ्यांची लाखो पोरं आज बेरोजगार झालेत. हा निर्णय पवारांच्या कारकिर्दीत झाला. कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला? आम्ही पुरोगामी आहोत ते दाखवण्याच्या नादात मराठ्यांचे भविष्य गाडले गेले असं त्यांनी म्हटलं.

तसेच जेव्हा एखाद्यात राज्यात निर्णय घेतला जातो, तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येतो. जर मान्य केले तर ते राज्यपालांकडे जाते आणि त्यावर जीआर काढला जातो. त्यावेळी काय काय झाले, कसा प्रस्ताव मांडला, कुणी मते मांडली, कुणी विरोध दर्शवला हे सगळे मराठा समाजासमोर यावे यासाठी श्वेतपत्रिका काढावी. रातोरात निर्णय घेतल्याने ५ कोटी मराठा समाजाचे नुकसान झाले. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. त्यानंतर युतीचे सरकार राज्यात आले. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या दबावामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा २७ वरून ३० टक्क्यांवर आली असंही नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाची दयनीय परिस्थिती पाहिली की आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के मराठा आहेत. आमच्यातले काही पुढारलेले असतील पण त्यांच्याकडे बघून इतरांचे मूल्यमापन करू शकत नाही. आम्हाला निकषांच्या फेऱ्यात का अडकवले जातंय..? ओबीसीत माळी येतात, त्या माळी समाजात मुस्लीम समाजाचे बागवान लोकं येतात. हेदेखील आम्हाला माहिती नव्हते. १९९४ नंतर मराठ्यांच्या सुविधा बंद झाल्या तेव्हापासून आम्हाला हे कळायला लागले. १९९३-९४ पर्यंत मराठ्यांना मोफत शिक्षण मिळत होते, त्यानंतर हळूहळू उत्पन्न घटत गेले, त्यानंतर समाज जागा व्हायला लागला असंही नामदेवराव जाधव यांनी म्हटलं.

काय आहेतनेमका आरोप?

शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण गेले, ओबीसी यादीत १८१ नंबरवर मराठा समाजाचा उल्लेख होता. त्यावर फुल्ली मारली गेली. १८२ तेली, १८३ माळी होते, त्यांना आरक्षणात घेतले. जेव्हा ओबीसींची पहिली यादी बनली त्यात १८० जातींचा समावेश होता. जेव्हा सुधारित यादी तयार केली त्यात १८१ मराठा, १८२ तेली, १८३ माळी होते. मग १८१ नंबर गायब कसा झाला? ओबीसींना आधी ११ टक्के आरक्षण होते, ते ३ टक्क्यांनी वाढवून १४ टक्के केले. तेव्हा लेवा पाटील, लेवा कुणबी, लेवा पाटीदार यांचे कुठलेही आर्थिक, सामाजिक निकष सिद्ध झाले होते. शरद पवारांनी १४ वरून हे २७ टक्क्यांवर आरक्षण नेले असं नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारOBCअन्य मागासवर्गीय जाती