शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

पवारांनी 'गियर' बदलताच गयारामांचे धाबे दणाणले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:07 IST

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. सर्वच विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून  30 हून अधिक नेत्यांनी सत्तेसाठी पलायन. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत आव्हानही देऊन शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु,  शरद पवारांनी अचानक गिअर बदलल्याने सत्ताधाऱ्यांसह पक्षातून गेलेल्या गयारामांची चिंता वाढली आहे.

दिग्गज नेत्यांनी पलायन केल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कमकुवत झाला होता. तसेच पक्षातील नेत्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनंतरही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी सज्ज झाला असं चित्र नव्हतं. हे चित्र बदलण्यासाठी अखेर पवारच बाहेर पडले.

याच महिन्यापासून पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. त्यात त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षवेधी होती. तर साताऱ्यात पवारांनी छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध केलेले शक्तीप्रदर्शन चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कमबॅक करणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच पवारांना आलेली ईडीची नोटीस विरोधी पक्षासाठी संधीच म्हणावी लागेल.

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवारांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच विरोधकांकडून हे भाजपचे कृत्य असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील पवारांना पाठिंबा दर्शविला. तर राजू शेट्टी, अण्णा हजारे आणि एकनाथ खडसे यांनी पवारांची पाठराखण केली.

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.