शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

पवारांनी 'गियर' बदलताच गयारामांचे धाबे दणाणले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:07 IST

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. सर्वच विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून  30 हून अधिक नेत्यांनी सत्तेसाठी पलायन. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत आव्हानही देऊन शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु,  शरद पवारांनी अचानक गिअर बदलल्याने सत्ताधाऱ्यांसह पक्षातून गेलेल्या गयारामांची चिंता वाढली आहे.

दिग्गज नेत्यांनी पलायन केल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कमकुवत झाला होता. तसेच पक्षातील नेत्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनंतरही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी सज्ज झाला असं चित्र नव्हतं. हे चित्र बदलण्यासाठी अखेर पवारच बाहेर पडले.

याच महिन्यापासून पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. त्यात त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षवेधी होती. तर साताऱ्यात पवारांनी छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध केलेले शक्तीप्रदर्शन चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कमबॅक करणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच पवारांना आलेली ईडीची नोटीस विरोधी पक्षासाठी संधीच म्हणावी लागेल.

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवारांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच विरोधकांकडून हे भाजपचे कृत्य असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील पवारांना पाठिंबा दर्शविला. तर राजू शेट्टी, अण्णा हजारे आणि एकनाथ खडसे यांनी पवारांची पाठराखण केली.

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.