शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:31 IST

आगामी निवडणुकांसाठी आघाडीची ३० जूनला बैठक 

सातारा : देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आघाडीची बैठक ३० जूनला होईल. त्यामध्ये एकत्रित निर्णय घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली.सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेतील बैठकीसाठी पवार हे सातारा दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, हिंदी विरोधापेक्षा प्रथम मी एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) पाहतो. कारण, एआयचे फायदे आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांनाही एआयचे शिक्षण मिळावं याची काळजी घेतली पाहिजे. एआयचा शेती, उद्योग, शिक्षणातही फायदे आहेत. त्यामुळे केंद्र शासनानेही एआयला मान्यता दिलीय. राज्य शासनानेही ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर एआयचा वापर व्हायलाच हवा. यामुळे शेतकऱ्यांवरील ओझेही कमी होईल. तसेच रयत शिक्षण संस्थेनेही एआय वापरासाठी पुढाकार घेतला आहे. याचाही उपयोग होणारच आहे.राज्यातील शिक्षणात हिंदीला विरोध होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पवार यांनी प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, असा सल्ला शासनाला दिला. तर महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी निवडणुकीबाबत आघाडीत चर्चा होणार आहे. बैठकीत निर्णय घेणार आहोत, असे उत्तर देत अधिक बोलणे टाळले. तर इस्त्रायल-इराण युध्दाबाबतही त्यांनी भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असे मत मांडले.

‘शक्तीपीठ’ काय ते समजून घेणार; नंतरच बोलेन !सातारचा दौरा करुन आपण कोल्हापूरला चालला आहात. सांगली-कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. यावर आपली भूमिका काय राहणार, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर शरद पवार यांनी, हा प्रकल्प काय ते समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का ?. तसेच राज्य शासनानेही याबाबत माहिती दिली तर तीही घेईन. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. विरोधासाठी विरोध नको. याबाबत सर्व समजून घेतल्यानंतरच मी बोलेन, असे स्पष्ट केले.

आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही..देशात आणीबाणी लादल्याबद्दल भाजपने देशात आवाज उठवल्याचा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला. यावर पवार यांनी भाजपला शहाणपणाला सल्ला दिला. ते म्हणाले, आणीबाणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची जाहीर माफी मागितली होती. पुन्हा आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही. आणीबाणीला विरोध केलेल्यांच्या हातातच आता देशाची सत्ता असून ही वस्तूस्थिती आहे, अशी आठवणही शरद पवार यांनी भाजपला करुन दिली.