शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:31 IST

आगामी निवडणुकांसाठी आघाडीची ३० जूनला बैठक 

सातारा : देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आघाडीची बैठक ३० जूनला होईल. त्यामध्ये एकत्रित निर्णय घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली.सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेतील बैठकीसाठी पवार हे सातारा दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, हिंदी विरोधापेक्षा प्रथम मी एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) पाहतो. कारण, एआयचे फायदे आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांनाही एआयचे शिक्षण मिळावं याची काळजी घेतली पाहिजे. एआयचा शेती, उद्योग, शिक्षणातही फायदे आहेत. त्यामुळे केंद्र शासनानेही एआयला मान्यता दिलीय. राज्य शासनानेही ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर एआयचा वापर व्हायलाच हवा. यामुळे शेतकऱ्यांवरील ओझेही कमी होईल. तसेच रयत शिक्षण संस्थेनेही एआय वापरासाठी पुढाकार घेतला आहे. याचाही उपयोग होणारच आहे.राज्यातील शिक्षणात हिंदीला विरोध होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पवार यांनी प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, असा सल्ला शासनाला दिला. तर महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी निवडणुकीबाबत आघाडीत चर्चा होणार आहे. बैठकीत निर्णय घेणार आहोत, असे उत्तर देत अधिक बोलणे टाळले. तर इस्त्रायल-इराण युध्दाबाबतही त्यांनी भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असे मत मांडले.

‘शक्तीपीठ’ काय ते समजून घेणार; नंतरच बोलेन !सातारचा दौरा करुन आपण कोल्हापूरला चालला आहात. सांगली-कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. यावर आपली भूमिका काय राहणार, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर शरद पवार यांनी, हा प्रकल्प काय ते समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का ?. तसेच राज्य शासनानेही याबाबत माहिती दिली तर तीही घेईन. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. विरोधासाठी विरोध नको. याबाबत सर्व समजून घेतल्यानंतरच मी बोलेन, असे स्पष्ट केले.

आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही..देशात आणीबाणी लादल्याबद्दल भाजपने देशात आवाज उठवल्याचा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला. यावर पवार यांनी भाजपला शहाणपणाला सल्ला दिला. ते म्हणाले, आणीबाणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची जाहीर माफी मागितली होती. पुन्हा आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही. आणीबाणीला विरोध केलेल्यांच्या हातातच आता देशाची सत्ता असून ही वस्तूस्थिती आहे, अशी आठवणही शरद पवार यांनी भाजपला करुन दिली.