शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

बीए मराठीच्या अभ्यासक्रमात तरुणींबाबत लज्जास्पद कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:43 IST

परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी समाज दु:खीकविता वगळण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्कीसोशल मिडियावर नेटकऱ्यांमध्येही कवितेवर सुंदोपसुंद

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. एकीकडे मुलींवर अत्याचार वाढत असल्याचे चित्र असताना विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली. राज्यभरात याबाबत संताप निर्माण झालेला असताना यवतमाळात आदिवासी कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या पेपर सहामध्ये ‘महानगरीय जाणीवेचे साहित्य’ हा घटक अंतर्भूत आहे. या घटकात कवी दिनकर मनवर यांचा ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ हा कवितासंग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु, या संग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत आदिवासी समाजाच्या तरुणींबाबत अश्लील उल्लेख असल्याने आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत. ‘काळं असावं पाणी कदाचित, पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं, किंवा आदिवासी पोरीच्या ...सारखं जांभळं’ या ओळींमध्ये आदिवासी महिला, मुलींविषयी लज्जास्पद उल्लेख आला. सकल आदिवासी समाजाचा अपमान करणारी ही ओळ असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप नोंदविला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ७०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील तसेच दूरशिक्षण विभागातील पदवीच्या विद्यार्थ्यांना ही कविता अभ्यासण्यासाठी देण्यात आली आहे. त्यातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आदिवासी तरुणींना भयंकर मानसिक त्रास भोगावा लागू शकतो.त्यामुळे ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी, अभ्यासक्रम निवड मंडळाने ही कविता कोणत्या निकषावर अभ्यासक्रमात घेतली याचा तपास केला जावा, अशी मागणी बिरसा क्रांती दल आणि गोंडवाणा गणतंत्र पार्टीने केली आहे. कवी दिनकर मनवर, अभ्यासक्रम निवड समिती व कवितासंग्रह छापणाऱ्या पॉप्युलर प्रकाशन यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कविता वगळली, गुन्हे नोंदवाराज्यभरातून आदिवासी संघटनांनी आवाज उठविताच मुंबई विद्यापीठ सावध झाले. मराठी अभ्यास मंडळाचा तातडीने ठराव घेऊन संबंधित आक्षेपार्ह कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. या कवितेवर परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही, ही कविता कोणत्याही महाविद्यालयात शिकवू नये, असा आदेश विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव सुनिल भिरुड यांनी काढले. मात्र, संबंधित कवी, निवड समिती आणि प्रकाशकावर गुन्हे दाखल न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बिरसा क्रांतीदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी दिला आहे.सोशल मिडियावरही सुंदोपसुंदया कवितेवरून सोशल मिडियावर बरेच वादप्रतिवाद दररोज झडत आहेत. जुन्या प्रतिष्ठित कवींच्या कवितांचे दाखले दिले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र् याची परिमाणे तपासली जात आहेत. या सर्व चर्चेला कुठे विराम मिळतो तेच आता पाहणे बाकी आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षणliteratureसाहित्य