शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शिवसैनिकांनी 'सामना'तील 'मोस्ट वॉन्टेड'च्या घराची केली तोडफोड, शिवसेनेविरोधात केली होती पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 17:46 IST

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.  शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती.

शहापूर, दि. 24 - ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.  शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी शहाच्या शहापूर येथील घराची तोडफोड केली. 

नुकत्याच पार पडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या एकहाती विजयावर तिखट प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही निवडणूक भाजपाने 'मनी आणि मूनी ' यांच्या जोरावर जिंकल्याचा आरोप केला होता.  गुजराती समाजात असंतोष पसरल्याचे वातावरण निर्माण झाले असताना खुश शहाच्या घराची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 

आज शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त देखील मोस्ट वॉन्टेड या मथळ्याखाली हा खुश शहा कुठे कुणालाही दिसल्यास सामनाच्या कार्यालयास कळविण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी दुपारी १२ . ४० वाजताच्या दरम्यान अचानक जमा झालेल्या शिवसैनिक शहाच्या घरावर हल्लाबोल केला. मुंबई आणि ठाण्यातूनही आज काही शिवसैनिक शहापूरमध्ये दाखल झाले होते. मराठी द्वेषाचे कारणही विचारण्याचा प्रयत्न केला ; परंतू स्वतः खुश शहा हा घरात आढळून आला नाही. शिवसैनिकांच्या हल्ल्यात शहाच्या घराचे नुकसान झाले असून काही शिवसैनिकांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, संजय राऊत आणि मराठी माणसाबद्धल अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या खुश शहा याच्याविरुद्ध मुंबईतील सायबर सेल गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा, माधव भंडारी यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर-

राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे,असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी दिले.सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या आदरणीय मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तुलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशा शब्दांमध्ये भंडारींनी शिवसेनेवर टीका केली.त्यांनी सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुनःपुन्हा पसंती दिल्यामुळे भाजपाला यश मिळत आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आपल्याला थोडेसेच यश मिळाले आणि भाजपाला मात्र लोकांनी संपूर्ण यश दिले याबद्दल शिवसेनेला वाईट वाटणे आश्चर्यकारक आहे. उगाच जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर शिवसेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल, असा टोला त्यांनी हाणला.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेना