शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

संजय राठोडांना मंत्रीपद देऊन न्याय केला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच; शहाजीबापू पाटलांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:23 IST

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सोलापूर-

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राठोड यांना मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय केला असल्याचं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. 

"राजकारणात अनेकवेळा नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत असतात. संजय राठोड यांच्यावर जे आरोप झाले होते त्याप्रकरणात पोलिसांना त्यांना क्लिनचीट दिली आहे. एखादा आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्याला क्लीनचीट दिली असेल तर त्याचं राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही. एकनाथ शिंदे यांनी राठोडांबाबत जो निर्णय घेतला तो न्याय देणारा आहे", असं शहाजीबापू पाटील म्हणाले. 

खरी शिवसेना आमचीचशिंदे गट आणि शिवसेना असा वाद न्यायालयात सुरू असताना शहाजीबापू पाटील यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्हं देखील आम्हालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. राज्यघटनेप्रमाणे ज्या बाजूला बहुमत असतं त्या गटालाच चिन्ह मिळतं. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हालाच चिन्ह मिळेल. सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने लागतील, असं शहाजीबापू म्हणाले. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासारखे कष्टाळू मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना आशीर्वाद देत आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेलाच म्हणजेच एकनाथ शिंदे गटाला मिळेल असं शहाजीबापू यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rathodसंजय राठोडEknath Shindeएकनाथ शिंदे