शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

राजू शेट्टी ठोकणार कांद्यासाठी शड्डू

By admin | Updated: September 8, 2014 02:42 IST

कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालावी.

मुंबई : कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालावी. तसेच कांद्याचे दर वाढल्यावर निर्यात शुल्क लादून निर्यात रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने आता दर कमी झाल्यावर निर्यात अनुदान देण्याची तयारी दाखवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंगळवारपासून नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचा पोरखेळ सुरू आहे. मध्यंतरी कांद्याचे दर वाढले होते तेव्हा कांद्याचे निर्यात शुल्क दोनवेळा वाढवून निर्यात रोखण्याचा प्रयत्न केला गेला. गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होऊन बाजारातील आवक घटल्याने लागलीच कांद्याची आयात सुरू केली गेली. ग्राहकांना दिलासा देण्याकरिता केंद्र कांद्याची निर्यात रोखण्याकरिता निर्यात शुल्क वाढवू शकते तर मग आता कांद्याचे दर कमी झाल्यावर कांद्याच्या निर्यातीकरिता अनुदान का देत नाही, असा सवाल त्यांनी केला.