शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 05:05 IST

शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे

मुंबई : शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा नवीन अभ्यासक्रम हा ज्ञानरचनावादावर आधारित असणार आहे. ज्ञानार्जनाबरोबरीने स्पर्धेत उतरण्यासाठी अभ्यास केला जातो. त्यामुळे अभ्यासक्रमातील बदलांमध्ये बदलत्या परीक्षा पद्धतींशी सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून देण्यात आली आहे. मंडळातर्फे पाठ्यपुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी आवश्यकतेनुसार पुस्तकांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल. आत्तापर्यंत इयत्ता सहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रम बदलण्याच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. आता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची निर्मिती एकाच मंडळाकडून करण्यात येणार आहे. या आधी विद्या परिषदेकडून पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जात होती, तर बालभारतीतर्फे निर्मिती केली जात होती. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार, सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) आणि इयत्ता चौथी व पाचवी परिसर अभ्यास भाग १, २ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०१८-१९ (जून २०१८) मध्ये बदलणे अपेक्षित असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)