शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 05:05 IST

शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे

मुंबई : शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा नवीन अभ्यासक्रम हा ज्ञानरचनावादावर आधारित असणार आहे. ज्ञानार्जनाबरोबरीने स्पर्धेत उतरण्यासाठी अभ्यास केला जातो. त्यामुळे अभ्यासक्रमातील बदलांमध्ये बदलत्या परीक्षा पद्धतींशी सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून देण्यात आली आहे. मंडळातर्फे पाठ्यपुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी आवश्यकतेनुसार पुस्तकांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल. आत्तापर्यंत इयत्ता सहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रम बदलण्याच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. आता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची निर्मिती एकाच मंडळाकडून करण्यात येणार आहे. या आधी विद्या परिषदेकडून पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जात होती, तर बालभारतीतर्फे निर्मिती केली जात होती. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार, सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) आणि इयत्ता चौथी व पाचवी परिसर अभ्यास भाग १, २ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०१८-१९ (जून २०१८) मध्ये बदलणे अपेक्षित असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)