शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 05:05 IST

शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे

मुंबई : शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा नवीन अभ्यासक्रम हा ज्ञानरचनावादावर आधारित असणार आहे. ज्ञानार्जनाबरोबरीने स्पर्धेत उतरण्यासाठी अभ्यास केला जातो. त्यामुळे अभ्यासक्रमातील बदलांमध्ये बदलत्या परीक्षा पद्धतींशी सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून देण्यात आली आहे. मंडळातर्फे पाठ्यपुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी आवश्यकतेनुसार पुस्तकांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल. आत्तापर्यंत इयत्ता सहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रम बदलण्याच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. आता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची निर्मिती एकाच मंडळाकडून करण्यात येणार आहे. या आधी विद्या परिषदेकडून पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जात होती, तर बालभारतीतर्फे निर्मिती केली जात होती. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार, सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) आणि इयत्ता चौथी व पाचवी परिसर अभ्यास भाग १, २ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०१८-१९ (जून २०१८) मध्ये बदलणे अपेक्षित असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)