शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

राज्यात स्वाइनमुळे सात जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 30, 2015 02:15 IST

राज्यभरात स्वाइनमुळे एका दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्वाइन फ्लूच्या २५४ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. नागपूर, अमरावती, नाशिक, अहमदनगर

मुंबई : राज्यभरात स्वाइनमुळे एका दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्वाइन फ्लूच्या २५४ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. नागपूर, अमरावती, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी एकाचा स्वाइन फ्लूमुळे २९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. एका दिवसात स्वाइन फ्लूचे नवीन २८ रुग्ण राज्यात आढळले आहेत. १ जानेवारी ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यात एकूण ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राज्याबाहेरून आलेल्या ३८ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ६ हजार ८८२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाइन फ्लूमुळे २१ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे थुंकी, शिंकण्यावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबातून त्याचा प्रसार होतो. अनेकदा रुग्ण दुर्लक्ष करतात. यामुळे आजार बळवण्याची शक्यता असते. स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याकडून मिळाली. (प्रतिनिधी)