शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दहा दिवसांत राज्यभर पावणेसहा लाख लीटर दारू जप्त

By admin | Updated: April 24, 2017 03:03 IST

महामार्गावर दारूविक्री बंद करण्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे

जमीर काझी / मुंबईमहामार्गावर दारूविक्री बंद करण्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्या दहा दिवसांत जवळपास साडेपाच हजार गुन्हे दाखल करत तब्बल ५ लाख ७१ हजार ३१० लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी सूचना केलेल्या ‘क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारू बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या ४ हजार ७२७ जणांना अटक केली आहे. तर अडीच कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. एप्रिलच्या अखेरच्या दहा दिवसांतही अशाच कारवाईचा धडाका सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १ एप्रिलपासून महामार्गावर ५०० मीटर अंतरावर दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व आयुक्त, पोलीस अधीक्षकांना आपापल्या घटकांत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली होती. पोलीस ठाण्यातील दैनंदिन काम करत हे ‘आॅपरेशन’ पार पाडून त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावयाचा होता. त्यानुसार पहिल्या दहा दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल विविध घटकप्रमुखांकडून मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. त्यानुुसार १ ते १० एप्रिलमध्ये राज्यभरातून पोलिसांनी ३ लाख ६२ हजार ७४९ लीटर दारू जप्त केली, तर दोन लाख ८ हजार ५६१ लीटर दारू नष्ट केली आहे. त्यासाठी एकूण ५,४९२ गुन्हे दाखल करून ४ हजार ७२७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण दोन कोटी ४१ लाख ९८ हजार ३५१ रुपये किमतीचे मद्य ताब्यात घेतल्याचे अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी सांगितले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आंबेडकर जयंती व अन्य कार्यक्रम असल्यामुळे मोहिमेला स्थगिती दिली होती. आता पुन्हा २० ते ३० एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असेही बिहारी यांनी सांगितले.