शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पिंजाळवरील सात बंधारे पडले कोरडेठाक

By admin | Updated: June 10, 2016 03:31 IST

स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आज पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

वाडा: प्रशासनाच्या हलगर्जीने तसेच स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आज पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार महिने मुसळधार पाऊस पडून ही ह्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे फेब्रुवारी नंतर जिल्ह्यातील बहुतेक नद्या कोरड्या पडतात. आणि त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना वर्षानुवर्ष बसत आहे. मुंबईच्या २०१६ पर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पिंजाळ प्रकल्प ज्या नदीवर बांधला जाणार आहे ती पिंजाळ नदी आज बहुतेक ठिकाणी कोरडी पडली आहे. ज्या ठिकाणी नैसगिकरित्या खोल भाग (डोह) ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी फक्त पाण्याचे साठे राहिले आहेत. तर ह्या नदीवर असलेले ७ बंधारे हे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्याचा फटका वाडा व विक्रमगड तालुक्यातील गावे व पाड्यांना बसत आहे. युवास्पर्श या सामाजिक संस्थेने पिंजाळ नदीची पाहणी करून ह्या नदीवरील बंधाऱ्यांचा सर्वे केला असता या नदीवर आलमान (पिंगेमान),पाली, काशिवली, सापने, करंजा, वाकी ह ेबंधारे पाणलोट विभागाकडून एकदम निकृष्ट बांधले गेल्यामुळे ेह्या बंधाऱ्यांमध्य ेथोडेही पाणी शिल्लक नाही.तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम एकदम जीर्ण झाल्यामुळे ते निकामी ठरले आहेत. तरमलवाडा तसेच सापणे बुद्रुक येथे कोल्हापुरी पद्धतीचा मोठा बंधारा बांधल्यास पाण्याची पातळी आणखी वाढून त्याचा फायदा आणखी अनेक गावांना होऊ शकेल . (वार्ताहर)।जिल्ह्यात मोठया प्रमाणात नद्यांचे प्रमाण आहे. मात्र नियोजनाअभावी या नद्या मार्च-एप्रिल पर्यंत पूर्णपणे कोरडया पडतात. याकडे शासनाने गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. जर नियोजनबध्द बंधारे बांधले गले तर पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या होणार नाही आणि याचा लाभ शेतकऱ्यांनासुद्धा होईल.-सचिन विलास भोईरअध्यक्ष-युवा स्पर्श सामिजक संस्था