शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

समृद्धी महामार्गावर होणार सात कृषी केंद्रे, नवनगरे, प्रक्रिया उद्योग; प्रकल्प अहवाल १५ दिवसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 05:37 IST

शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित भूखंड, काही वर्षांपर्यंत दरवर्षी एकरी ७५ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : समृद्धी महामार्गालगत विदर्भ व मराठवाड्यातील सात ठिकाणी कृषी केंद्रे उभारण्यासाठी जवळपास ६१ टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. त्यातून नवनगरे, कृषी माल प्रक्रिया उद्योग व औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून १५ दिवसांत तो जाहीर होण्याची शक्यता आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी कृषी केंद्रे व नवनगरांचा विकास केला जाईल. इंटरचेंजनजीक भूसंचयन (लँड पुलिंग) करून शेतकऱ्यांच्या भागीदारीने ही नवनगरे वसविली जातील. जमिनींच्या मोबदल्यात ३० टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे, तर शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत  दरवर्षी एकरी ७५ हजार रुपये देण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित नवनगरांत सर्व सोयीसुविधांनी युक्त आधुनिक टाउनशिपची निर्मितीही केली जाणार आहे. विविध प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग कृषी केंद्रांमध्ये प्रस्तावित आहेत. 

कृषी केंद्रे कोणकोणत्या जिल्ह्यांत?

जिल्हा    ठिकाण     आवश्यक       ताब्यात     जमीन    आलेले क्षेत्र

  1. वर्धा     केळझर    ६९३    ४८ 
  2. वर्धा     विरूळ नागझरी    १,१३३     ८९७ 
  3. बुलढाणा    मेहकर (साब्रा-काब्रा)     १,४१८     ४४५ 
  4. बुलढाणा    सावरगावमाळ    १,९४५     १,५१२ 
  5. छ. संभाजीनगर    हडस पिंपळगाव    १,०४९     ४६२ 
  6. छ. संभाजीनगर    घायगाव जांबरगाव    १,२७४     १,१३१ 
  7. छ. संभाजीनगर    वैजापूर (धोत्रे बाबतारा)    १,९६८     १,२९५ 

 

१५,११९ - शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार

  • ५,५१६ - शेतकऱ्यांची जमीन देण्यास संमती 
  • ९,४८१ - हेक्टर जमीन सात कृषी केंद्रांसाठी आवश्यक 
  • ५,७९२ - हेक्टर जमिनीसाठी एमएसआरडीसीला संमती

कृषी केंद्रांसाठी ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे. तसेच या कृषी केंद्रांतून पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल.-अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग