शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

समृद्धी महामार्गावर होणार सात कृषी केंद्रे, नवनगरे, प्रक्रिया उद्योग; प्रकल्प अहवाल १५ दिवसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 05:37 IST

शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित भूखंड, काही वर्षांपर्यंत दरवर्षी एकरी ७५ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : समृद्धी महामार्गालगत विदर्भ व मराठवाड्यातील सात ठिकाणी कृषी केंद्रे उभारण्यासाठी जवळपास ६१ टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. त्यातून नवनगरे, कृषी माल प्रक्रिया उद्योग व औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून १५ दिवसांत तो जाहीर होण्याची शक्यता आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी कृषी केंद्रे व नवनगरांचा विकास केला जाईल. इंटरचेंजनजीक भूसंचयन (लँड पुलिंग) करून शेतकऱ्यांच्या भागीदारीने ही नवनगरे वसविली जातील. जमिनींच्या मोबदल्यात ३० टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे, तर शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत  दरवर्षी एकरी ७५ हजार रुपये देण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित नवनगरांत सर्व सोयीसुविधांनी युक्त आधुनिक टाउनशिपची निर्मितीही केली जाणार आहे. विविध प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग कृषी केंद्रांमध्ये प्रस्तावित आहेत. 

कृषी केंद्रे कोणकोणत्या जिल्ह्यांत?

जिल्हा    ठिकाण     आवश्यक       ताब्यात     जमीन    आलेले क्षेत्र

  1. वर्धा     केळझर    ६९३    ४८ 
  2. वर्धा     विरूळ नागझरी    १,१३३     ८९७ 
  3. बुलढाणा    मेहकर (साब्रा-काब्रा)     १,४१८     ४४५ 
  4. बुलढाणा    सावरगावमाळ    १,९४५     १,५१२ 
  5. छ. संभाजीनगर    हडस पिंपळगाव    १,०४९     ४६२ 
  6. छ. संभाजीनगर    घायगाव जांबरगाव    १,२७४     १,१३१ 
  7. छ. संभाजीनगर    वैजापूर (धोत्रे बाबतारा)    १,९६८     १,२९५ 

 

१५,११९ - शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार

  • ५,५१६ - शेतकऱ्यांची जमीन देण्यास संमती 
  • ९,४८१ - हेक्टर जमीन सात कृषी केंद्रांसाठी आवश्यक 
  • ५,७९२ - हेक्टर जमिनीसाठी एमएसआरडीसीला संमती

कृषी केंद्रांसाठी ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे. तसेच या कृषी केंद्रांतून पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल.-अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग