शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, चंद्रकांत पाटील अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:16 IST

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह  भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना

मुंबई, दि. 13 - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह  भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठी समाजाने विराट मूक मोर्चा काढला होता. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला होता. मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोर्चावेळी म्हटलं होतं.मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 ऑगस्ट रोजी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा --  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती मिळणार.-  शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट काढून 50 टक्के करण्यात आली आहे. - ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.- अण्णासाहेब पाटील महामंडळांकडून शेतकरी कुटुंबातील तीन लाख तरूण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच बँकांकडून दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येईल. - मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार त्याच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील. - सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, सध्या हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे. - कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. - तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार.- मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात येईल, ही समिती मराठा संघटनांबरोबर दर दोन ते तीन महिन्यांनी चर्चा करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.  

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस