शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पोटच्या गोळ्यांना केले 'सर्जा-राजा'

By admin | Updated: July 8, 2016 17:51 IST

अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून

ऑनलाइन लोकमतभडगाव, दि. ८ : अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून शेतीची मशागत सुरू केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुपनगर येथील अतिशय गरीब कुटुंबातील अल्पभुधारक शेतकरी धारासिंग वंजारी यांनी शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल नसल्यामुळे मशागतीसाठी त्याने हे पाऊल उचलले आहे.

त्यांच्याकडे वडिलोपार्जीत तीन एकर शेती आहे. परंतु शेती हलक्या प्रतिची असल्यामुळे जो पैसा शेतीसाठी खर्च होतो तितके उत्पन्न निघत नाही. दरवर्षी पावसाचा लहरीपणामुळे शेतीत नापिकी होत आहे. शेतात भरघोस उत्पन्न यावे यासाठी त्यांनी कर्ज काढून विहीर खोदली, ठिबक केले परंतु विहिरीला पावसाअभावी मुबलक पाणी नाही. शेतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो ते भांडवल त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या दोघा मुलांना सर्जा राजा बनवून शेती मशागत करण्याचे कष्टाचे तंत्र अवलंबले आहे.

शेतीची कामे सर्वत्र जोरात सुरू असल्याने बैल जोडीचेही कामाचे दरही वधारले आहेत. एका वेळी बैलजोडीने शेतीची मशागत करण्याचे ठरवले म्हणजे एक हजार रुपये रोज आहे व पिकांची निंदणी करण्याचा स्त्रियांचा एका दिवसाला दीडशे रुपये. एवढे भांडवल नसल्यामुळे त्यांची मुलं धनसिंग (इ.१०वी) व विशाल (इ.८ वी) हे दोन्ही शाळा बुडवून आपल्या वडिलांना शेती कामात मदत करतात. त्यांना पत्नी कमलबाई राबत आहे. ेमजुरी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्हाला हे सगळं करावे लागते, अशी माहिती या शेतकऱ्याकडून मिळाली.

शेतीसाठी बियाणेही उधारीने आणावे लागले. आता पुन्हा शेती मशागतीसाठी पैसे कुठून आणावेत हा प्रश्न होताच दुसऱ्याकडे मजुरी करुन घरच्या शेतीची कामेही ते करतात. मशागतीसाठी बैलजोडी मिळण्यास उशीर झाल्यास शेतात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असते. वेळेत मशागत केल्यास शेतात गवतही होत नाही आणि म्हणूनच पैशांची बचत करण्यासाठी या शेतकऱ्याने अपार कष्टाचे हे तंत्र नाईलाजाने स्वीकारले. यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्यामुळे हाताला काम नाही. अशात शेतकऱ्याने हातात भांडवल नाही म्हणून हतबल न होता मेहनतीने शेतात सोनं पिकवू अशी जिद्द मनाशी बाळगली आहे.कर्ज काढून विहीर खोदली, ठिबक केले, मुलीचेही लग्न केले. परंतु दरवर्षी शेतीसाठी जो खर्च होतो तोही निघत नाही. तर कर्ज कुठून फिटेल. या कर्जापायी गेल्या दोन वर्षापासून ही नवी शक्कल लढवली. पोटच्या गोळ्यांना औताला जुपतो व पूर्ण शेतीची मशागत करतो. यामुळे शेती मशागतीसाठी होणारा खर्च वाचतो व वेळेवर शेतीही तयार होते.-धारासिंग सरीचंद वंजारी, रुपनगर पळासखेडेअल्पभूधारक शेतकरी.