शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Ruta Jitendra Awhad: केवळ २ तासांपूर्वी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे आजपर्यंत गंभीर परिणाम; ऋता आव्हाड यांनी मांडले वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 09:32 IST

लॉकडाऊनचा निर्णय  व्यवस्थित विचार आणि व्यवस्थापन करून घेण्यात आला असता तर कदाचित ही परिस्थिती टाळता आली असती, असे त्या म्हणाल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या सन्माननीय व्यक्तीनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला त्यांचा आदर राखत सांगते की, केवळ २ तासांपूर्वी निर्णय घेऊन देशभरात लॉकडाऊन केल्याने लोकांना काय हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याची त्यांना कल्पनाही नाही. कोणत्याही परिस्थितीचा आणि कुठल्याही लोकांचा विचार न करता अनेक लोक जिथे आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, त्या जागी दिवसेंदिवस, महिनोन्महिने अडकून पडले. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे एकाच ठिकाणी अडकून पडले असले तरी काही दिवसांत त्यांच्या बचती संपल्या आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, हे वास्तव आहे, असे ऋता आव्हाड यांनी सांगितले. 

अनेकांकडे पैसा असूनही त्यांना हव्या त्या प्रमाणात वस्तू खरेदी करता आल्या नाहीत. त्या काळात प्राथमिकता असलेल्या औषध, मास्कसारख्या गोष्टींचा काळाबाजार झालाच, शिवाय अन्नधान्याचा साठा करून अनेकांनी गैरमार्गाने पैसा कमावला. कोविड काळात सरकारकडेही मोठ्या प्रमाणात निधी आला तरी त्यापैकी बहुतांशी रक्कम कोविड व्यवस्थापन व उपचारावर खर्च होत असल्याने त्यांनाही सढळ हाताने सगळ्यांना मदत करणे अशक्य झाले.

त्यानंतरच्या परिस्थितीतही निर्बंध कमी झाले तरी २ लसींची परवानगी आवश्यक असल्याने अद्यापही अनेक मजूर, कारागीर यांचे आयुष्य रुळावर आले नाही. लॉकडाऊनचा निर्णय  व्यवस्थित विचार आणि व्यवस्थापन करून घेण्यात आला असता तर कदाचित ही परिस्थिती टाळता आली असती, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन