शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दिशा सालियन प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारला थेट आव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:26 IST

Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला थेट आव्हान दिले आहे. हवी ती चौकशी करायची आहे ती करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सभागृहामध्ये जोरदार रणकंदन झाले. दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला थेट आव्हान दिले आहे. हवी ती चौकशी करायची आहे ती करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, माझ्या मुलीची बदनामी थांबवा अशी विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी करूनही तसेच मुलीची बदनामी न थांबल्यास आपण जगू शकणार नाही, अशी विनंती त्यांनी राष्ट्रपतींकडे केल्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. उद्या सगळीकडे हेच दिसणार आहे. यापैकी अनेकाची तरुण मुलं मुली आहेत. मग हे लोक त्यांच्या मुला-मुलींची बदनामी सहन करू शकतील का? दु:खाची बाब म्हणजे एका घोटाळेबाज मुख्यमंत्र्याला वाचवण्यासाठी काही पातळी उरली नाही आहे का? आपल्या विधिमंडळात कधीही असले घानेरडे राजकारण झाले नव्हते. ते आज दिसत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.  

हवी ती चौकशी करायची आहे ती करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले आहे. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहे. आज हे घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्री ज्या एका केसमध्ये सापडले आहे त्याबाबत सभागृहात बोलण्यापासून रोखण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी पक्ष हा सतत वेलमध्ये उतरत असल्याचे मी पहिल्यांदाच बघतोय. तसेच अध्यक्ष आणि तालिका अध्यक्ष हे आम्हाला बोलू देत नाही. गेल्या अडीच वर्षांत मी असं कधीही पाहिलं नव्हतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन