शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

तृतीयपंथीयांसाठीही हवे स्वतंत्र स्वच्छतागृह

By admin | Updated: September 2, 2016 06:04 IST

महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत

मुंबई : महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत उभी राहिलेली ‘राईट टू पी’ ही चळवळ. या चळवळीला देशपातळीवर नेण्यासाठी आयोजित अधिवेशनात तृतीयपंथीयांचा स्वच्छतागृहांचा प्रश्न समोर आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘राईट टू पी’चे एका विशिष्ट पातळीवर विस्तारीकरण झाल्याचे या वेळी स्पष्ट झाले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कोरो संस्था आणि राईट टू पी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राईट टू पी’चे राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात राज्यासह देशातील विविध भागांमधून महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र आल्या. त्यामध्ये छत्तीसगड येथून तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी महिला मुताऱ्यांप्रमाणेच तृतीयपंथीयांना स्वतंत्र स्वच्छतागृहे हवी असल्याकडे लक्ष वेधले. या अधिवेशनात आमदार नीलम गोऱ्हे, आमदार विद्या चव्हाण, भाजपाच्या नेत्या शायना एनसी आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, पत्रकार निखिल वागळे, प्रियंका कौल उपस्थित होते. ‘राईट टू पी’ ते ‘राईट टू सीटी’ या चर्चासत्रात उपस्थितांनी स्मार्ट सिटीपासून महिला मुताऱ्या, त्यांची अवस्था अशा विषयांवर चर्चा केली. महिला मुताऱ्यांचा प्रश्न मांडताना हा प्रश्न आहे का? असे आम्हालाच आधी विचारले जात होते. पण, आता मानसिकता बदलत आहे. या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. स्मार्ट सिटीचा विचार करताना स्वच्छतागृहांचा विचार नक्कीच केला जाईल. पेट्रोलपंपवाले तिथली स्वच्छतागृहे महिलांना वापरण्यासाठी द्यायला तयार आहेत. पण, त्यासाठी परवानगी मिळत नाही. चळवळ पुढे नेण्यासाठी थेट वरून आदेश येतील, असे पाहिले पाहिजे. प्रत्येकाशी बोलत राहण्यापेक्षा हा चांगला उपाय असल्याचे मत आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मनसे नेत्या शालिनी ठाकरे म्हणाल्या, ‘टू पी आॅर नॉट टू पी इज द क्वेश्चन’ हा प्रश्न आजच्या सर्व महिलांच्या डोक्यात असतो. मुंबईसारख्या शहरातही शौचालये, मुताऱ्यांची सोय नाही. स्वातंत्र्यानंतरही महिलांना मूलभूत हक्कासाठी का झगडावे लागत आहे? स्वच्छता आणि आरोग्य हे महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यावर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याचा विचार व्हायला हवा. भाजपा नेत्या शायना एनसी यांनी सांगितले, ‘राईट टू पी’ चळवळीबरोबरच भारतीयांना ‘हाऊ टू पी’ हे शिकवण्याची आवश्यकता आहे. राज्यातील ७० महिलांचा मृत्यू हा ‘सॅनिटायझेशन रिलेटेड सायकोलॉजिकल स्ट्रेस’मुळे (एसआरपीएस) झाला आहे. पण या आजाराविषयी महिलांमध्ये अजूनही जनजागृती नाही. यावरून या विषयाकडे किती गांभीर्याने पाहिले पाहिजे, हे स्पष्ट होते. स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर बायोटॉयलेट हे उत्तर नाही. त्यासाठी वेगळे मार्ग शोधले पाहिजेत. (प्रतिनिधी)उद्या सादर करणार गृहनिर्माण धोरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. उद्या गृहनिर्माण धोरण जाहीर होणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. अनेक वर्षे लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. एसआरएचे प्रकल्प आहेत. गृहनिर्माण धोरणात नक्कीच स्वच्छतागृह, महिला मुताऱ्यांचा विचार झाला असेल, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.