शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

तृतीयपंथीयांसाठीही हवे स्वतंत्र स्वच्छतागृह

By admin | Updated: September 2, 2016 06:04 IST

महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत

मुंबई : महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत उभी राहिलेली ‘राईट टू पी’ ही चळवळ. या चळवळीला देशपातळीवर नेण्यासाठी आयोजित अधिवेशनात तृतीयपंथीयांचा स्वच्छतागृहांचा प्रश्न समोर आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘राईट टू पी’चे एका विशिष्ट पातळीवर विस्तारीकरण झाल्याचे या वेळी स्पष्ट झाले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कोरो संस्था आणि राईट टू पी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राईट टू पी’चे राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात राज्यासह देशातील विविध भागांमधून महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र आल्या. त्यामध्ये छत्तीसगड येथून तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी महिला मुताऱ्यांप्रमाणेच तृतीयपंथीयांना स्वतंत्र स्वच्छतागृहे हवी असल्याकडे लक्ष वेधले. या अधिवेशनात आमदार नीलम गोऱ्हे, आमदार विद्या चव्हाण, भाजपाच्या नेत्या शायना एनसी आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, पत्रकार निखिल वागळे, प्रियंका कौल उपस्थित होते. ‘राईट टू पी’ ते ‘राईट टू सीटी’ या चर्चासत्रात उपस्थितांनी स्मार्ट सिटीपासून महिला मुताऱ्या, त्यांची अवस्था अशा विषयांवर चर्चा केली. महिला मुताऱ्यांचा प्रश्न मांडताना हा प्रश्न आहे का? असे आम्हालाच आधी विचारले जात होते. पण, आता मानसिकता बदलत आहे. या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. स्मार्ट सिटीचा विचार करताना स्वच्छतागृहांचा विचार नक्कीच केला जाईल. पेट्रोलपंपवाले तिथली स्वच्छतागृहे महिलांना वापरण्यासाठी द्यायला तयार आहेत. पण, त्यासाठी परवानगी मिळत नाही. चळवळ पुढे नेण्यासाठी थेट वरून आदेश येतील, असे पाहिले पाहिजे. प्रत्येकाशी बोलत राहण्यापेक्षा हा चांगला उपाय असल्याचे मत आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मनसे नेत्या शालिनी ठाकरे म्हणाल्या, ‘टू पी आॅर नॉट टू पी इज द क्वेश्चन’ हा प्रश्न आजच्या सर्व महिलांच्या डोक्यात असतो. मुंबईसारख्या शहरातही शौचालये, मुताऱ्यांची सोय नाही. स्वातंत्र्यानंतरही महिलांना मूलभूत हक्कासाठी का झगडावे लागत आहे? स्वच्छता आणि आरोग्य हे महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यावर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याचा विचार व्हायला हवा. भाजपा नेत्या शायना एनसी यांनी सांगितले, ‘राईट टू पी’ चळवळीबरोबरच भारतीयांना ‘हाऊ टू पी’ हे शिकवण्याची आवश्यकता आहे. राज्यातील ७० महिलांचा मृत्यू हा ‘सॅनिटायझेशन रिलेटेड सायकोलॉजिकल स्ट्रेस’मुळे (एसआरपीएस) झाला आहे. पण या आजाराविषयी महिलांमध्ये अजूनही जनजागृती नाही. यावरून या विषयाकडे किती गांभीर्याने पाहिले पाहिजे, हे स्पष्ट होते. स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर बायोटॉयलेट हे उत्तर नाही. त्यासाठी वेगळे मार्ग शोधले पाहिजेत. (प्रतिनिधी)उद्या सादर करणार गृहनिर्माण धोरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. उद्या गृहनिर्माण धोरण जाहीर होणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. अनेक वर्षे लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. एसआरएचे प्रकल्प आहेत. गृहनिर्माण धोरणात नक्कीच स्वच्छतागृह, महिला मुताऱ्यांचा विचार झाला असेल, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.