शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:29 IST

Senior Advocate Ujjwal Nikam On EVM Issue: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. उगीच आमचा अंदाज आहे, आमचा संशय आहे, यावर सुप्रीम कोर्टात टिकाव लागणार नाही, असे सांगत उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर टीका केली.

Senior Advocate Ujjwal Nikam On EVM Issue: विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीने पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आणि ईव्हीएमविरोधात तीव्र निषेध नोंदवला. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. खुद्द शरद पवार यांनी या ठिकाणी जाऊन महायुतीवर टीका केली. शरद पवार यांच्या सभेनंतर भाजपाकडून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध जनजागृती केली जात आहे. भाजपा नेतेही या गावात जात आहेत. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यातच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी यावरून विरोधकांचे कान टोचलेत.

मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या पाच मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लिपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाहीत. राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅटमधील उमेदवारनिहाय स्लिपची संख्या यात कुठेही तफावत आढळलेली नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. यानंतर आता उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले

संपूर्ण जगात भारतात लोकशाही प्रबळ आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. परंतु, माझ्या मते याला कायदेशीर आधार नाही. कारण ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगानेही यापूर्वी काही विशेष चाचण्या केल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्या ठेवल्या होत्या. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आता तुम्ही महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रितीने याचे भांडवल करणे, सामान्य जनतेची दिशाभूल करणे, हे लोकशाहीमध्ये योग्य नाही, असे उज्ज्वल निकम यांनी नमूद केले.

दरम्यान, अर्थात यासंदर्भात त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येू शकते. सर्वोच्च न्यायालयात त्यांना प्रथमतः प्राथमिक पुरावा द्यावा लागेल. ईव्हीएमबाबतीत कशा प्रकारे गडबड झाली, हे जर त्यांना दाखवायचे असेल, तर प्रमाणभूत आधार द्यावा लागेल. उगीच आमचा अंदाज आहे, आमचा संशय आहे, असे दावे करून संशयाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात कोणतीही गोष्ट टिकाव धरू शकत नाही, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमEVM Machineईव्हीएम मशीनmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४