शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला औरंगाबादेत अमान्य

By admin | Updated: January 21, 2017 00:41 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विजय सरवदे,

औरंगाबाद- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हाभरात या निवडणुकीचाच माहोल आहे. असे असले तरी युती-आघाडीबद्दल सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परवापर्यंत शिवसेना - भाजपा युतीसंबंधी झालेल्या दोन्ही बैठका फिसकटल्या आहेत. मागील निवडणुकीतील जागावाटपाच्या फार्म्युल्यावर सेना ठाम आहे, तर या वेळी दोन आमदार आणि दोन नगराध्यक्ष, नगरसेवक वाढले असल्यामुळे जिल्ह्यात आमची ताकद वाढली असल्याचा दावा करून भाजपाने शिवसेनेपुढे ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला ठेवला आहे. भाजपाचा हा फार्म्युला मात्र शिवसेनेला अमान्य आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्यातरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे मनसुबे वाढले आहेत. या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-१५, राष्ट्रवादी काँग्रेस-१०, शिवसेना-१९, भाजपा-६, मनसे-७ आणि अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, मनसेच्या मदतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली सत्ता खेचून घेतली.गेल्या पाच वर्षांत घडलेल्या झेडपीतील अनेक घडामोडी राजकीय पटलावर लक्षवेधक ठरल्या. काँग्रेसने खेचून आणलेली सत्ता कायम टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे निवडून आलेल्या उमेदवारांपैकी चार जण काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.।अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच बादऔरंगाबाद जिल्हा परिषदेत पूर्वी ६० गट व १२० गण होते. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोगाने गट व गणांची नव्याने फेररचना केल्यानंतर आता दोन गट व चार गण वाढले आहेत.त्यानुसार ६२ गट व १२४ गण निर्माण झाले. औरंगाबाद तालुक्यात आता १० गट, पैठण तालुक्यात ९, गंगापूर तालुक्यात ९, वैजापूर तालुक्यात ८, खुलताबाद तालुक्यात ३, फुलंब्री तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ८, सिल्लोड तालुक्यात ८ आणि सोयगाव तालुक्यात ३ गट झाले आहेत.गट व गणांच्या फेररचनेनंतर आरक्षणही नव्याने निश्चित झाले असून, अनेक ठिकाणी मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला गेला तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.