शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

सेनेला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला औरंगाबादेत अमान्य

By admin | Updated: January 21, 2017 00:41 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विजय सरवदे,

औरंगाबाद- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हाभरात या निवडणुकीचाच माहोल आहे. असे असले तरी युती-आघाडीबद्दल सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परवापर्यंत शिवसेना - भाजपा युतीसंबंधी झालेल्या दोन्ही बैठका फिसकटल्या आहेत. मागील निवडणुकीतील जागावाटपाच्या फार्म्युल्यावर सेना ठाम आहे, तर या वेळी दोन आमदार आणि दोन नगराध्यक्ष, नगरसेवक वाढले असल्यामुळे जिल्ह्यात आमची ताकद वाढली असल्याचा दावा करून भाजपाने शिवसेनेपुढे ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला ठेवला आहे. भाजपाचा हा फार्म्युला मात्र शिवसेनेला अमान्य आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्यातरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे मनसुबे वाढले आहेत. या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-१५, राष्ट्रवादी काँग्रेस-१०, शिवसेना-१९, भाजपा-६, मनसे-७ आणि अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, मनसेच्या मदतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली सत्ता खेचून घेतली.गेल्या पाच वर्षांत घडलेल्या झेडपीतील अनेक घडामोडी राजकीय पटलावर लक्षवेधक ठरल्या. काँग्रेसने खेचून आणलेली सत्ता कायम टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे निवडून आलेल्या उमेदवारांपैकी चार जण काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.।अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच बादऔरंगाबाद जिल्हा परिषदेत पूर्वी ६० गट व १२० गण होते. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोगाने गट व गणांची नव्याने फेररचना केल्यानंतर आता दोन गट व चार गण वाढले आहेत.त्यानुसार ६२ गट व १२४ गण निर्माण झाले. औरंगाबाद तालुक्यात आता १० गट, पैठण तालुक्यात ९, गंगापूर तालुक्यात ९, वैजापूर तालुक्यात ८, खुलताबाद तालुक्यात ३, फुलंब्री तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ८, सिल्लोड तालुक्यात ८ आणि सोयगाव तालुक्यात ३ गट झाले आहेत.गट व गणांच्या फेररचनेनंतर आरक्षणही नव्याने निश्चित झाले असून, अनेक ठिकाणी मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला गेला तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.