शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सेनेला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला औरंगाबादेत अमान्य

By admin | Updated: January 21, 2017 00:41 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विजय सरवदे,

औरंगाबाद- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हाभरात या निवडणुकीचाच माहोल आहे. असे असले तरी युती-आघाडीबद्दल सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परवापर्यंत शिवसेना - भाजपा युतीसंबंधी झालेल्या दोन्ही बैठका फिसकटल्या आहेत. मागील निवडणुकीतील जागावाटपाच्या फार्म्युल्यावर सेना ठाम आहे, तर या वेळी दोन आमदार आणि दोन नगराध्यक्ष, नगरसेवक वाढले असल्यामुळे जिल्ह्यात आमची ताकद वाढली असल्याचा दावा करून भाजपाने शिवसेनेपुढे ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला ठेवला आहे. भाजपाचा हा फार्म्युला मात्र शिवसेनेला अमान्य आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्यातरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे मनसुबे वाढले आहेत. या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-१५, राष्ट्रवादी काँग्रेस-१०, शिवसेना-१९, भाजपा-६, मनसे-७ आणि अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, मनसेच्या मदतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली सत्ता खेचून घेतली.गेल्या पाच वर्षांत घडलेल्या झेडपीतील अनेक घडामोडी राजकीय पटलावर लक्षवेधक ठरल्या. काँग्रेसने खेचून आणलेली सत्ता कायम टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे निवडून आलेल्या उमेदवारांपैकी चार जण काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.।अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच बादऔरंगाबाद जिल्हा परिषदेत पूर्वी ६० गट व १२० गण होते. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोगाने गट व गणांची नव्याने फेररचना केल्यानंतर आता दोन गट व चार गण वाढले आहेत.त्यानुसार ६२ गट व १२४ गण निर्माण झाले. औरंगाबाद तालुक्यात आता १० गट, पैठण तालुक्यात ९, गंगापूर तालुक्यात ९, वैजापूर तालुक्यात ८, खुलताबाद तालुक्यात ३, फुलंब्री तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ८, सिल्लोड तालुक्यात ८ आणि सोयगाव तालुक्यात ३ गट झाले आहेत.गट व गणांच्या फेररचनेनंतर आरक्षणही नव्याने निश्चित झाले असून, अनेक ठिकाणी मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला गेला तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.