शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यावर आणण्याचं सेनेचं आधीच ठरलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:45 IST

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केला असून सरकार स्थापनच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने यावेळी चाणाक्षपणे चाली खेळत भाजपला बाजुला सारले आहे. मात्र याची सुरुवात निवडणुकीपूर्वीच झाली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

2014 मध्ये आधी विरोधात आणि नंतर सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेला मागील पाच वर्ष भाजपने मंत्रीपदांसाठी झुरत ठेवलं. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभय पक्षांचं वैर पराकोटीला गेलं होतं. मात्र एवढं सगळ झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती झाली. यात शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र त्याचवेळी ही युती विधानसभेसाठी देखील राहिल असं ठरल होतं.

विधानसभेला ठरल्याप्रमाणे युतीसाठी चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बोलणी झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदासंर्भात काहीही बोलणं झालं नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटली. 

दरम्यान जागा वाटपात मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यात आणायचं अशी योजना तर शिवसेनेची नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इरादा भाजपचा होता. मात्र देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे अखेर युती झाली. यामध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. परंतु, भाजप 122 हून 105 वर आले. त्यामुळे अर्थातच भाजपला बहुमतासाठी झगडावे लागत आहे. किंबहुना युतीमुळे भाजपची बहुमताची संधी हुकल्याचा मतप्रवाह आहे. 

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे. भाजपने राज्यात 164 जागा लढवल्या. स्ट्राईकरेट गेल्यावेळपेक्षा चांगला असला तरी सत्ता मिळाली नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे सेनेचा तो डाव यशस्वी झाला का, असा प्रश्न भाजपनेत्यांना पडला आहे.