शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यावर आणण्याचं सेनेचं आधीच ठरलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:45 IST

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केला असून सरकार स्थापनच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने यावेळी चाणाक्षपणे चाली खेळत भाजपला बाजुला सारले आहे. मात्र याची सुरुवात निवडणुकीपूर्वीच झाली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

2014 मध्ये आधी विरोधात आणि नंतर सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेला मागील पाच वर्ष भाजपने मंत्रीपदांसाठी झुरत ठेवलं. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभय पक्षांचं वैर पराकोटीला गेलं होतं. मात्र एवढं सगळ झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती झाली. यात शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र त्याचवेळी ही युती विधानसभेसाठी देखील राहिल असं ठरल होतं.

विधानसभेला ठरल्याप्रमाणे युतीसाठी चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बोलणी झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदासंर्भात काहीही बोलणं झालं नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटली. 

दरम्यान जागा वाटपात मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यात आणायचं अशी योजना तर शिवसेनेची नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इरादा भाजपचा होता. मात्र देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे अखेर युती झाली. यामध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. परंतु, भाजप 122 हून 105 वर आले. त्यामुळे अर्थातच भाजपला बहुमतासाठी झगडावे लागत आहे. किंबहुना युतीमुळे भाजपची बहुमताची संधी हुकल्याचा मतप्रवाह आहे. 

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे. भाजपने राज्यात 164 जागा लढवल्या. स्ट्राईकरेट गेल्यावेळपेक्षा चांगला असला तरी सत्ता मिळाली नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे सेनेचा तो डाव यशस्वी झाला का, असा प्रश्न भाजपनेत्यांना पडला आहे.