शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यावर आणण्याचं सेनेचं आधीच ठरलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:45 IST

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केला असून सरकार स्थापनच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने यावेळी चाणाक्षपणे चाली खेळत भाजपला बाजुला सारले आहे. मात्र याची सुरुवात निवडणुकीपूर्वीच झाली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

2014 मध्ये आधी विरोधात आणि नंतर सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेला मागील पाच वर्ष भाजपने मंत्रीपदांसाठी झुरत ठेवलं. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभय पक्षांचं वैर पराकोटीला गेलं होतं. मात्र एवढं सगळ झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती झाली. यात शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र त्याचवेळी ही युती विधानसभेसाठी देखील राहिल असं ठरल होतं.

विधानसभेला ठरल्याप्रमाणे युतीसाठी चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बोलणी झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदासंर्भात काहीही बोलणं झालं नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटली. 

दरम्यान जागा वाटपात मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यात आणायचं अशी योजना तर शिवसेनेची नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इरादा भाजपचा होता. मात्र देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे अखेर युती झाली. यामध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. परंतु, भाजप 122 हून 105 वर आले. त्यामुळे अर्थातच भाजपला बहुमतासाठी झगडावे लागत आहे. किंबहुना युतीमुळे भाजपची बहुमताची संधी हुकल्याचा मतप्रवाह आहे. 

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे. भाजपने राज्यात 164 जागा लढवल्या. स्ट्राईकरेट गेल्यावेळपेक्षा चांगला असला तरी सत्ता मिळाली नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे सेनेचा तो डाव यशस्वी झाला का, असा प्रश्न भाजपनेत्यांना पडला आहे.