शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

चहा विकून सीए बनलेला सोमनाथ अंथरुणावर खिळून

By admin | Updated: March 11, 2017 19:54 IST

चहावाला पंतप्रधान बनू शकतो. या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी सोमनाथ गिराम अथक परिश्रमातून चार्टर्ड अकौंटंट-सी.ए.बनला व राज्य शासनाने त्याची दखल घेऊन

नासीर कबीर, आॅनलाईन लोकमत

करमाळा, दि. 11 - चहावाला पंतप्रधान बनू शकतो. या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी सोमनाथ गिराम अथक परिश्रमातून चार्टर्ड अकौंटंट-सी.ए.बनला व राज्य शासनाने त्याची दखल घेऊन त्यास कमवा आणि शिका या योजनेचा सदिच्छा दूत-ब्रॅड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून घोषित केले. पण सोमनाथचा अपघात झाल्यानंतर तो सध्या अंथरुणावर खिळून असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाच्या मदतीविना त्याचे आयुष्य अंधारात सापडले आहे.

सोमनाथ बळीराम गिराम हा युवक करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी असून गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत जिद्द, चिकाटी अंगी बाळगून संघर्ष करीत स्वत:चे व कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी पुण्यात फुटपाथवर चहाचे दुकान थाटून काम करीत वाणिज्य,सहकार विभागाची पदवी घेऊन गतवर्षी २०१६ मध्ये अ वर्गात सी.ए. बनला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सी.ए.बनलेल्या सोमनाथ गिरामची राज्य शासनाने दखल घेतली. कमवा व शिका या योजनेचा सदिच्छादूत म्हणून त्याची निवड केली.

८ सप्टेंबर २०१६ रोजी सोमनाथ अकलूज येथून सांगवी (ता.करमाळा) येथे येत असताना तो ज्या वाहनात येत होता त्या वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने गाडी पलटी झाली. त्यात त्याच्या मणक्याला मार लागला.मणक्यातील मज्जारज्जू दबल्याने कमरे खालील भाग निकामी झाला आहे. त्याला उठून चालता येत नाही.सोमनाथ गिराम यास अद्ययावत उपचारांची गरज आहे, पण त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो उपचार घेऊ शकत नाही. मुलाच्या अपघाताचा धक्का सहन न झाल्याने डिसेंबर २०१६ मध्ये सोमनाथच्या मातोश्री किशोरी गिराम यांचा मृत्यू झाला.

सोमनाथ गिरामकडे पैसा नसल्याने त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शासनाकडून केवळ लाख रुपयांची मदत झाली. त्याशिवाय गरवारे महाविद्यालयाने पन्नास हजार रुपयांची मदत केली. सोमनाथचे वडील बळीराम यांनी उसनवारी, कर्ज करून ५० हजार रुपये औषधोपचारावर खर्च केले आहेत. दहा ते बारा लाख रूपये उपचारावर खर्च होऊनही सोमनाथ बरा होत नसल्याने तो निराश बनला आहे. सोमनाथ गिरामला मदतीची अपेक्षा आहे़ सरकारकडे याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ आयुष्य अंधकारमय बनले...सांगवी येथे लहान भाऊ श्रीकांत उर्फ मुन्ना व वयोवृध्द वडील बळीराम असून तेच त्याची आता देखभाल करीत आहेत.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जिद्द व चिकाटीतून त्याने मिळवलेल्या यशानंतर राज्य शासनाने त्यास ह्यकमवा आणि शिकाह्ण या योजनेचा ब्रॅड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून घोषित केले खरे, पण त्यास कसलीही आर्थिक मदत केलेली नाही. आता तो अंथरुणावर व स्ट्रेचरवर आहे तरीही राज्य शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुणवंत सोमनाथ गिरामचे आयुष्य अंधकारमय बनले आहे.