शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

सेल्फीच्या नादात तरुणाचा झाला मृत्यू

By admin | Updated: July 17, 2017 01:10 IST

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांपैकी काही अतिउत्साही पर्यटक कुंडात उंचावरून उड्या मारतात.

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांपैकी काही अतिउत्साही पर्यटक कुंडात उंचावरून उड्या मारतात. त्यामुळे गेल्या वर्षी या कुंडात तब्बल आठहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. कोंडेश्वरपाठोपाठ आता भोज धरणही पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. या धरणातही एका तरुणाचा सेल्फी काढत असताना तोल गेल्याने पाण्यात पडून मृत्यू झाला. या दोन्ही ठिकाणी सुरक्षेचे उपाय केलेले असतानाही पर्यटकांचा उत्साहीपणा आणि पाण्यासोबत केलेली मस्ती त्यांच्या जीवावर बेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी तारेचे कुंपण घातले. उंचावरून उड्या मारणाऱ्यांना अडथळा निर्माण केल्यावर मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. या वर्षीदेखील तशाच प्रकारची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोंडेश्वर धबधब्यावर अद्याप कोणताही मोठा अपघात झालेला नाही. मात्र, आता कोंडेश्वरजवळच असलेल्या भोज धरणाच्या पाण्याच्या पात्रात भिजण्याचा आनंद घेणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धरणातील जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी जो बंधारा बांधला आहे, त्याची उंची सरासरी २० फूट आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे पाणी बाहेर पडते, त्या ठिकाणी खोल खड्डा झाला आहे. या खोल पाण्यात बंधाऱ्यावरून उड्या मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या तरुणांना पोहता येत नाही, त्यांच्यासाठी उड्या मारण्याचा खेळ जीवावर बेतणारा आहे.