शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सागरी सामर्थ्यात आत्मनिर्भर! ‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलात; शत्रूला उत्तर देण्यास सक्षम : संरक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 06:02 IST

नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात भारतीय बनावटीची सर्वात मोठी विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.

मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रातील सागरी वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्राला सुरक्षित आणि खुले ठेवणे ही भारतीय नौदलाची प्राथमिक जबाबदारी आहे. काही बेजबाबदार देश संकुचित आणि वर्चस्ववादी धोरणांसाठी आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे सोयीस्कर अर्थ लावत आहेत, चुकीच्या व्याख्या मांडत आहेत. सागरी सुव्यवस्थेसाठी असे देश धोकादायक असल्याचे सांगत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी चीनवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात भारतीय बनावटीची सर्वात मोठी विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षणमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दळणवळण आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कळीच्या आणि महत्त्वाच्या या सागरी क्षेत्राला सुरक्षित आणि खुले ठेवणे, ही भारतीय नौदलाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे राजनाथसिंह यांनी ठामपणे सांगितले.जागतिकीकरणाच्या या युगात सर्व देश एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे स्थैर्य, आर्थिक विकासासाठी नियमबद्ध मुक्त सागरी संचार, सागरी मार्गांची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे बनले आहे. १९८२ च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेतही सागरी कायद्यांबाबत विस्ताराने चर्चा झाली. एखाद्या देशाचे सागरी क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र आणि योग्य सागरी व्यवस्था या मूल्यांवर भर देण्यात आला; परंतु या मूल्यांचा मनमानी व्याख्या नियमबद्ध सागरी व्यवस्थेत अडथळा निर्माण करतात. काही बेजबाबदार देश आपल्या वर्चस्ववादी धोरणांसाठी या आंतरराष्ट्रीय नियमांचे सोयीस्कर अर्थ लावतात, चुकीच्या व्याख्या मांडतात, असे ते म्हणाले.

शत्रूला चकवा देण्याची क्षमता -  विनाशिका स्टेल्थ प्रणालीवर आधारित. शत्रूच्या रडारला चकवा देण्याच्या क्षमतेची वैशिष्ट्यपूर्ण संरचना.  -  अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज-  पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा समावेश-  विनाशिकेवर अत्याधुनिक टेहळणी रडार-  स्वदेशी बनावटीच्या रॉकेट लॉन्चर्स, टॉर्पेडो लॉन्चर्सचा वापर

आयएनएस विशाखापट्टणम ही देशाच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक आहे. ही विनाशिका प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सागरी सामर्थ्याचे, जहाज बांधणी कौशल्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारी आहे. अत्याधुनिक यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी ही अत्याधुनिक विनाशिका सागरी सुरक्षा बळकट करील आणि राष्ट्रहिताचे रक्षण करेल. आगामी काळात भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर जागतिक गरजांच्या पूर्ततेसाठी जहाज बांधणी क्षेत्रात सक्षम होईल.- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूसराजनाथसिंह यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहindian navyभारतीय नौदलSoldierसैनिक