शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'आत्मनिर्भर' भारतातली 'श्रीमंत' माणसं ; 8 हजार औषधी वनस्पतींचा 'आदिवासीं'कडे खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:43 IST

अनेक वर्षांचा औषधी वनस्पतींचा ठेवा जतन केला समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. 

ठळक मुद्देरोजगारासाठी, आरोग्यासाठी व्हावा उपयोग ; संशोधन प्रकल्प राहतात पडून 

पुणे : आदिवासी भागात ८ हजारहून अधिक औषधी वनस्पती असल्याची नोंद पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यांचे औषधी गुणधर्मही सांगितले आहेत. आता त्यावर सरकारने योग्य नियोजन करून त्या त्या आदिवासी भागात संशोधन केंद्र, वनस्पती जतनासाठी मार्गदर्शन, त्यांची बाजारपेठ तयार करणे आदींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यातून आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल आणि लोकवनस्पतींचे संवर्धन करता येईल. तसेच त्यामुळे समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे आदिवासी भागातील लोकवनस्पती विज्ञान (इथनो बायोलाँजी) हा प्रकल्प काही वर्षांपुर्वी घेतला होता. त्यात देशातील २० संस्थांचा सहभाग होता. देशातून आदिवासी क्षेत्रातून वनस्पतींची माहिती संकलित केली. १० हजारपेक्षा अधिक वनस्पतींची उपयोगिता समोर आली. त्यात ८ हजार वनस्पतींचे २५ हजार औषधी उपयोग नोंदविले गेले. ६ हजार नवीन उपयोग समोर आले. कारण आयुर्वेदात २ हजार वनस्पतींची माहिती आहे, अशी माहिती जेष्ठ वनस्पती तज्ज्ञ डाँ. विनया घाटे यांनी दिली.

सध्या आदिवासीमधील नवीन पिढी पोटापाण्यासाठी शहराकडे येत आहे. त्यांना त्यांच्या भागातच रोजगार उपलब्ध व्हायला हवा. स्थानिक पातळीवर कोणत्या वनस्पती येतात आणि त्यांचे उपयोग, त्याला बाजारपेठ कुठे ही साखळी तयार व्हायला हवी. सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन मार्गदर्शन करून रोजगार द्यायला हवा. ठिकठिकाणी वनस्पती संशोधन केंद्र उभी करून त्याची उपयोगिता सांगायला हवी. तरच हा अनेक वर्षांचा ठेवा जतन होईल आणि आदिवासींना देखील आत्मनिर्भर होता येईल, असे घाटे यांनी सांगितले. झ्र----------------वनस्पतींचे काही औषधी उपयोग मलेरियासाठी सिंकोना साल वापरतात. यातील क्विनाइनमुळे मलेरिया बरा होतो.  अशक्तपणावर हळंद्याचे कंद, शक्तीपातावर निर्गुडीचा पाला, जनावर सुदृढ होण्यास रामन्था खायला देणे, कावीळ झाल्यावर अखरा हळंद्याचा कंद खायला देणे असे अनेक उपयोग आहेत. ----------------------फक्त संशोधन होऊन उपयोग नसतो. त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अनेकजण संशोधन करतात. सरकारकडे प्रकल्प सादर होतात. पण त्यावर पुढे काहीच होत नसेल तर संशोधनाचा उपयोग कसा होणार ? - डाँ. विनया घाटे, जेष्ठ वनस्पतीतज्ज्ञ ---------------------आयुर्वेदासाठी औषधी वनस्पती लागतात. पण तसे आणून देणारे माहितीगार नाहीत. पुर्वी होते आता नाहीत. आदिवासी भागात सध्या रोजगार नाही. त्यांना वनस्पतींबाबत योग्य दिशा दिली, तर वनस्पती जतन होतील आणि त्यांना काम उपलब्ध होईल. 

- डाँ. सुहास शितोळे, आयुर्वेद तज्ज्ञ  

टॅग्स :PuneपुणेTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाMedicalवैद्यकीयHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार