शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा बलाचे जवान संपावर, अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचे तीनतेरा, नोकरीच्या हमीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:41 IST

महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनवाढीसह कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत सुरक्षा रक्षकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे.

मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनवाढीसह कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत सुरक्षा रक्षकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे.सुरक्षा बलाच्या जवानांची सुरक्षा सध्या मुंबई मेट्रोसह विमानतळ, शासकीय रुग्णालये आणि महत्त्वाच्या देवस्थानांबाहेर तैनात करण्यात आली होती. मात्र पूर्वसूचना न देता पुकारलेल्या या संपामुळे सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. संबंधित जवानांचे नेतृत्व करणा-या भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, कायमस्वरूपी नोकरीसाठी सर्व जवान २८ सप्टेंबरला लोणावळ्याहून आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहेत. या पदयात्रेतून नोकरीच्या हमीची मागणी जवान करतील.मुळात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ शासनाचे वैधानिक महामंडळ असून, गृह खात्यातील आजी आणि माजी अधिकारी त्यावर देखरेख ठेवत आहेत. त्याबदल्यात अधिकाºयांना ६० ते ७० हजार रुपये पगार मिळत असताना जवानांना मात्र १० ते १२ हजार रुपये वेतन दिले जात आहे. त्यातही आस्थापनांकडून महामंडळ जवानांच्या नावे २२ ते २४ हजार रुपये वसूल करतआहे.अशा परिस्थितीत पूर्णवेळ काम करणाºया जवानांना कायमस्वरूपी नोकरीत घेऊन संपूर्ण मोबदला देण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. नाहीतर १ आॅक्टोबरला संपूर्ण शक्तीनिशी आझाद मैदानात निदर्शने करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.>मेट्रोवर परिणाम नाही!सुरक्षा बलाचे जवान संपावर गेल्याने मुंबई मेट्रोच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. मुळात सुरक्षा पुरवण्याचे काम राज्य सरकारचे असून, जवान संपावर गेल्यानंतर मेट्रो प्रशासनाने खासगी सुरक्षा पुरवली आहे. शिवाय या आंदोलनाची माहिती राज्य सरकारसह एमएमआरडीए आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था काही काळासाठी खंडित झाल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीसह तपासणीच्या ठिकाणी मेट्रोप्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.>‘महाराष्ट्र सदन’बाहेरही आंदोलनराज्यातील सुरक्षा बलाच्या जवानांनी संप पुकारल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील युनिटनेही मंगळवारी दुपारी काम बंद केले. महाराष्ट्र सदनाबाहेर सुरक्षेसाठी तैनात जवान दुपारी कामावर आलेच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेबाबतच चर्चेला उधाण आले होते.नेमके कोण आहेतहे सुरक्षा बलाचे जवान?२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, राम प्रधान समितीने केलेल्या शिफारशीनुसार,मे २०१० साली या सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.राज्यातील १३० आस्थापनांत सुरक्षा बल सुरक्षा पुरविते.दलाचे ६ हजार जवान राज्यभर तैनात असून, त्यातील ४० टक्के जवान एकट्या मुंबईत काम करत आहेत.जवानांना गेल्या दीड वर्षांपासून पगारवाढ मिळालेली नाही.महामंडळ आस्थापनांकडून दरमहा २३ हजार रुपये शस्त्रधारी जवानांसाठी, तर शस्त्राशिवाय असलेल्या जवानांसाठी २० हजार रुपये घेते.