शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सुरक्षा बलाचे जवान संपावर, अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचे तीनतेरा, नोकरीच्या हमीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:41 IST

महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनवाढीसह कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत सुरक्षा रक्षकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे.

मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनवाढीसह कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत सुरक्षा रक्षकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे.सुरक्षा बलाच्या जवानांची सुरक्षा सध्या मुंबई मेट्रोसह विमानतळ, शासकीय रुग्णालये आणि महत्त्वाच्या देवस्थानांबाहेर तैनात करण्यात आली होती. मात्र पूर्वसूचना न देता पुकारलेल्या या संपामुळे सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. संबंधित जवानांचे नेतृत्व करणा-या भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, कायमस्वरूपी नोकरीसाठी सर्व जवान २८ सप्टेंबरला लोणावळ्याहून आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहेत. या पदयात्रेतून नोकरीच्या हमीची मागणी जवान करतील.मुळात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ शासनाचे वैधानिक महामंडळ असून, गृह खात्यातील आजी आणि माजी अधिकारी त्यावर देखरेख ठेवत आहेत. त्याबदल्यात अधिकाºयांना ६० ते ७० हजार रुपये पगार मिळत असताना जवानांना मात्र १० ते १२ हजार रुपये वेतन दिले जात आहे. त्यातही आस्थापनांकडून महामंडळ जवानांच्या नावे २२ ते २४ हजार रुपये वसूल करतआहे.अशा परिस्थितीत पूर्णवेळ काम करणाºया जवानांना कायमस्वरूपी नोकरीत घेऊन संपूर्ण मोबदला देण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. नाहीतर १ आॅक्टोबरला संपूर्ण शक्तीनिशी आझाद मैदानात निदर्शने करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.>मेट्रोवर परिणाम नाही!सुरक्षा बलाचे जवान संपावर गेल्याने मुंबई मेट्रोच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. मुळात सुरक्षा पुरवण्याचे काम राज्य सरकारचे असून, जवान संपावर गेल्यानंतर मेट्रो प्रशासनाने खासगी सुरक्षा पुरवली आहे. शिवाय या आंदोलनाची माहिती राज्य सरकारसह एमएमआरडीए आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था काही काळासाठी खंडित झाल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीसह तपासणीच्या ठिकाणी मेट्रोप्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.>‘महाराष्ट्र सदन’बाहेरही आंदोलनराज्यातील सुरक्षा बलाच्या जवानांनी संप पुकारल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील युनिटनेही मंगळवारी दुपारी काम बंद केले. महाराष्ट्र सदनाबाहेर सुरक्षेसाठी तैनात जवान दुपारी कामावर आलेच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेबाबतच चर्चेला उधाण आले होते.नेमके कोण आहेतहे सुरक्षा बलाचे जवान?२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, राम प्रधान समितीने केलेल्या शिफारशीनुसार,मे २०१० साली या सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.राज्यातील १३० आस्थापनांत सुरक्षा बल सुरक्षा पुरविते.दलाचे ६ हजार जवान राज्यभर तैनात असून, त्यातील ४० टक्के जवान एकट्या मुंबईत काम करत आहेत.जवानांना गेल्या दीड वर्षांपासून पगारवाढ मिळालेली नाही.महामंडळ आस्थापनांकडून दरमहा २३ हजार रुपये शस्त्रधारी जवानांसाठी, तर शस्त्राशिवाय असलेल्या जवानांसाठी २० हजार रुपये घेते.