शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्म समभाव

By admin | Updated: July 26, 2015 03:02 IST

बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली.

- डॉ. एस. एन. पठाण

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कुलगुरू आहेत.)बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली. ज्ञानदेवांना वेदापेक्षा गीता श्रेष्ठ वाटली. गीता ही कृष्णाने, एका गवळ्याने - भारतीयांचे सावळे परब्रह्म असलेल्या विठ्ठलाने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितली होती. ज्ञानदेवांनी सर्वधर्म समभाव असलेल्या आणि अखिल मानवजातीला शिरोधार्य असलेल्या गीतेवर अत्यंत सुंदर असे काव्यभाष्य केले, भावार्थदीपिका लिहिली. तुकाराम महाराज समाजसुधारकसमता हाच संत साहित्याचा अंतरिक प्रवाह होता आणि संतांनी यातून समाजाचे लौकिक आणि पारलौकिक सुख शोधले. म्हणूनच संत तुकाराम महाराज धर्मसुधारकापेक्षाही समाजसुधारक म्हणून अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यामुळेच तर त्यांची सुफी संत अनगडशहा बाबा यांच्याशी भेट झाली. संतांनी त्या काळात सर्वधर्म समभाव निर्माण केला.महायोगी, मानवता यात्री श्री. एम. (पूर्वाश्रमीचे मुमताज अली खान, केरळ) यांना वयाच्या २४व्या वर्षी संतश्रेष्ठ माउलींचा साक्षात्कार झाला. याची रोमहर्षक कहाणी त्यांनी स्वत: इंद्रायणी तटावरच सांगितली आणि हज्जारो वारकरी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर माउलीच्या समाधीचे त्यांनी मोहन भागवत यांच्यासोबत घेतलेले दर्शन म्हणजे जणू ‘माउलीच्या मंदिरात पसायदानाचा घडलेला हा साक्षात्कारच’ म्हणावा लागेल.संसार - परमार्थाची सांगड घालणाऱ्या आणि त्यातून भक्ती व कर्मयोग यांचा समन्वय साधणाऱ्या या तत्त्वज्ञानाचा सर्व वारकरी संतांनी स्वीकार केला. म्हणूनच ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे आपण म्हणतो. जगासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवापासून प्रेरणा घेऊन कन्याकुमारीपासून २५०० मैलांचा पायी प्रवास करत श्री एम (पूर्वाश्रमीचे मुमताज अली खान, वय ६६) आषाढी वारीच्या वेळी आळंदीत दाखल व्हावेत हासुद्धा योगायोगच. विश्वाच्या कल्याणाचे स्वप्नज्ञानेशांनी पसायदानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले. अद्वैत सिद्धान्तांची मांडणी करून सर्वत्र एकच असे आत्मतत्त्व संचार करते असे मांडले. हिंंदू असो अथवा इस्लाम, दोन्ही धर्मांत परमात्म्याचे अस्तित्व मान्य केले आहे. तोच विश्वाचा निर्माता आहे, हेही मान्य केले आहे. वारकरी संतांनी तर ईश्वराला ‘तूज सगुण म्हणू की निर्गुण रे? असे विचारले आहे तर समर्थांनी राम म्हणजेच आत्माराम असे समीकरण मांडले आहे. प्रार्थना करताना शरीर आणि मन निर्मळ असले पाहिजे हे हिंंदू-मुस्लिमांना मान्य आहे. अर्थात प्रत्येक धर्मात थोडे वेगळेपण असणे हे स्वाभाविक आहे. अशी सामंजस्याची व परमसहिष्णुतेची भूमिका घेतल्यामुळे हिंंदू आणि मुसलमान आपण दोघे भाऊ-भाऊच आहोत असे संतांना वाटते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरू चाँद बोधले (सुफींच्या कादरी शाखेचे चांद कादरी) होते. तर शेख महंमद यांची गुरुपरंपरा सुफींच्या कादरी शाखेची असतानाही ते वारकरी सांप्रदयाचेदेखील मानले जातात. ते विठ्ठलभक्त होते व त्यांनी विठ्ठल भक्तीवर शेकडो अभंग लिहिले. अंबर हुसेन हे मुसलमान संतकवी यांनी ‘अंबर हुसैनी’ ही गीताटीका लिहिली तर समर्थ रामदासांनी मुसलमानी अष्टंक लिहिले. हीच परंपरा संतांना अपेक्षित आहे.