शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सर्वधर्म समभाव

By admin | Updated: July 26, 2015 03:02 IST

बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली.

- डॉ. एस. एन. पठाण

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कुलगुरू आहेत.)बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली. ज्ञानदेवांना वेदापेक्षा गीता श्रेष्ठ वाटली. गीता ही कृष्णाने, एका गवळ्याने - भारतीयांचे सावळे परब्रह्म असलेल्या विठ्ठलाने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितली होती. ज्ञानदेवांनी सर्वधर्म समभाव असलेल्या आणि अखिल मानवजातीला शिरोधार्य असलेल्या गीतेवर अत्यंत सुंदर असे काव्यभाष्य केले, भावार्थदीपिका लिहिली. तुकाराम महाराज समाजसुधारकसमता हाच संत साहित्याचा अंतरिक प्रवाह होता आणि संतांनी यातून समाजाचे लौकिक आणि पारलौकिक सुख शोधले. म्हणूनच संत तुकाराम महाराज धर्मसुधारकापेक्षाही समाजसुधारक म्हणून अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यामुळेच तर त्यांची सुफी संत अनगडशहा बाबा यांच्याशी भेट झाली. संतांनी त्या काळात सर्वधर्म समभाव निर्माण केला.महायोगी, मानवता यात्री श्री. एम. (पूर्वाश्रमीचे मुमताज अली खान, केरळ) यांना वयाच्या २४व्या वर्षी संतश्रेष्ठ माउलींचा साक्षात्कार झाला. याची रोमहर्षक कहाणी त्यांनी स्वत: इंद्रायणी तटावरच सांगितली आणि हज्जारो वारकरी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर माउलीच्या समाधीचे त्यांनी मोहन भागवत यांच्यासोबत घेतलेले दर्शन म्हणजे जणू ‘माउलीच्या मंदिरात पसायदानाचा घडलेला हा साक्षात्कारच’ म्हणावा लागेल.संसार - परमार्थाची सांगड घालणाऱ्या आणि त्यातून भक्ती व कर्मयोग यांचा समन्वय साधणाऱ्या या तत्त्वज्ञानाचा सर्व वारकरी संतांनी स्वीकार केला. म्हणूनच ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे आपण म्हणतो. जगासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवापासून प्रेरणा घेऊन कन्याकुमारीपासून २५०० मैलांचा पायी प्रवास करत श्री एम (पूर्वाश्रमीचे मुमताज अली खान, वय ६६) आषाढी वारीच्या वेळी आळंदीत दाखल व्हावेत हासुद्धा योगायोगच. विश्वाच्या कल्याणाचे स्वप्नज्ञानेशांनी पसायदानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले. अद्वैत सिद्धान्तांची मांडणी करून सर्वत्र एकच असे आत्मतत्त्व संचार करते असे मांडले. हिंंदू असो अथवा इस्लाम, दोन्ही धर्मांत परमात्म्याचे अस्तित्व मान्य केले आहे. तोच विश्वाचा निर्माता आहे, हेही मान्य केले आहे. वारकरी संतांनी तर ईश्वराला ‘तूज सगुण म्हणू की निर्गुण रे? असे विचारले आहे तर समर्थांनी राम म्हणजेच आत्माराम असे समीकरण मांडले आहे. प्रार्थना करताना शरीर आणि मन निर्मळ असले पाहिजे हे हिंंदू-मुस्लिमांना मान्य आहे. अर्थात प्रत्येक धर्मात थोडे वेगळेपण असणे हे स्वाभाविक आहे. अशी सामंजस्याची व परमसहिष्णुतेची भूमिका घेतल्यामुळे हिंंदू आणि मुसलमान आपण दोघे भाऊ-भाऊच आहोत असे संतांना वाटते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरू चाँद बोधले (सुफींच्या कादरी शाखेचे चांद कादरी) होते. तर शेख महंमद यांची गुरुपरंपरा सुफींच्या कादरी शाखेची असतानाही ते वारकरी सांप्रदयाचेदेखील मानले जातात. ते विठ्ठलभक्त होते व त्यांनी विठ्ठल भक्तीवर शेकडो अभंग लिहिले. अंबर हुसेन हे मुसलमान संतकवी यांनी ‘अंबर हुसैनी’ ही गीताटीका लिहिली तर समर्थ रामदासांनी मुसलमानी अष्टंक लिहिले. हीच परंपरा संतांना अपेक्षित आहे.